शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 14:45 IST

corona: भाजप नेते राजकारण थांबवत नाहीत, अशी टीका पवारांनी केलीय.

ठळक मुद्देभाजप नेते राजकारण थांबवत नाहीत, हे दुर्दैवी वाटतंगुजरातमधील परिस्थिती विदारक, उत्तर प्रदेशची अवस्था चांगली नाहीही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची

मुंबई: महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची स्थिती भयंकर होताना दिसत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला लॉकडाऊन म्हणणार नाही, असे सांगत कठोर निर्बंध लागू केले. १४ एप्रिल ते १ मे या पंधरा दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आले असून, यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मात्र, भाजपशासित राज्यांमध्येही कोरोना संकट भीषण असून, तेथे कोरोनाचे व्यवस्थापक चांगले असल्याचा विरोधकांचा दावा फोल ठरतो, असे सांगत पवार यांनी महाविकास आघाडी सरकारची बाजू उचलून धरली आहे. (rohit pawar criticises bjp over corona and other various issues)

केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रा व्यतिरिक्त छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरयाणा, बिहार आदी राज्यांमध्येही करोनाचं संकट भीषण असल्याचं दिसून येतं. या राज्यांपैकी सहा राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपशासित राज्यांमधील करोना व्यवस्थापन खूपच चांगलं असल्याने तिथं करोना येत नाही हा विरोधकांचा दावा फोल ठरतो. यावरून राजकारण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावं, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विरोधकांवर रोहित पवार यांनी निशाणा साधला.

राज्यात काय सुरू आणि काय बंद? पाहा, एका क्लिकवर

भाजप नेते राजकारण थांबवत नाहीत

भाजपचे नेते महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीवरुन राजकारण करणं थांबवत नाहीत, हे दुर्दैवी वाटतं. आज राजकारणाची वेळ नसतानाही महाराष्ट्रातील सरकार असमर्थ आहे, इथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली अशाप्रकारची विधानं विरोधकांकडून केली जात आहेत. ही गोष्ट मात्र निश्चितच खरीय की महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त आहे आणि रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होतेय. मात्र हे संकट रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सर्व राज्यसरकार करतंय हेही तेवढंच खरंय. राज्यात परत एकदा नाईलाजास्तव कठोर निर्बंध घालण्याची वेळ सरकारवर आली, असे रोहित पवार म्हणाले. 

लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर

कोरोना लसीकरणात आज महाराष्ट्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे. आतापर्यंत राज्याने १ कोटी ५ लाख २९ हजार लसी दिल्या. यामध्ये पहिला डोस ९५ लाख २० हजार ७२५ लोकांना तर दुसरा डोस १० लाख ८ हजार लोकांना देण्यात आला. आज आपण दररोज साडेतीन ते चार लाख नागरिकांना लस देत असून आपली लसीकरणाची क्षमता ६ लाख प्रतिदिवसापर्यंत वाढवलीय. लस वाया जाण्याचे प्रमाणही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अत्यंत कमी आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

मोफत अन्नधान्य, अर्थसहाय्य, अनुदान... निर्बंध कडक करताना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 'पॅकेज'

गुजरातमधील परिस्थिती विदारक

गुजरातचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तिथंही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सुरत, अहमदाबाद, जामनगरमध्ये बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्णांवर हॉस्पिटलच्या आवारात, फरशीवर, खुर्चीवर बसून उपचार चालू असल्याचं चित्र पहायला मिळतं. दुसरीकडं मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी आठ-आठ तास थांबावं लागत असल्याचं विदारक चित्र पाहताना मन हेलावून जातं. रुग्णवाहिका नसल्याने कोणी चार चाकीतून मृतदेह नेतंय तर कोणी हात गाड्यावरून आहे. हे आज गुजरातचं भीषण वास्तव आहे, अशा शब्दांत पवार यांनी विरोधकांना आरसा दाखवला. 

उत्तर प्रदेशची अवस्था चांगली नाही

उत्तर प्रदेशमध्येही रुग्णांची अवस्था काही चांगली नाही. तिथं तर तीन रुग्णांना लस म्हणून रेबीजचं इंजेक्शन दिल्याची अत्यंत धक्कादायक बाब पुढं आली. बिहारमध्येही कोरोनाचे व्यवस्थापन नीट होत नसल्याचे निदर्शनास येतंय. तसंच मृतांची संख्याही सरकार लपवत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या, अशी टीका करत ही गोष्ट मात्र निश्चितच खरीय की महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त आहे आणि काही रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होतेय, मात्र हे संकट रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सर्व राज्यसरकार करतंय हेही तेवढंच खरंय. पहिल्या लाटेपेक्षा ही लाट अत्यंत तीव्र आहे, रुग्णवाढीचा वेगही अधिक आहे, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले. 

महिन्याला १० हजार कमावणाऱ्या रिक्षाचालकांना केवळ दीड हजार; भाजपचे टीकास्त्र

ही मानवतेची लढाई

मला आजच्या परिस्थितीबाबत कोणाला दोष द्यायचा नाही. मला विरोधकांनाही हेच सांगायचंय की ही वेळ एकमेकांची उणी-दुणी काढण्याची नसून एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करण्याची आहे. ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे. आमच्या विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे करोना हा केवळ एखाद्याच राज्यात वाढत नसून तो सगळीकडेच वाढतोय. या कठीण काळात सगळ्या यंत्रणेचा कस लागतोय. अशा परिस्थितीत आपण भांडत बसलो तर त्यात नुकसानच अधिक होणार आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस