शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार परत करणे अर्थहीन!

By admin | Updated: October 16, 2015 03:38 IST

देशातील असहिष्णू वातावरणाचे खापर केंद्र सरकारवर फोडून, साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले जात आहेत, पण सोलापुरातील ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार

रवींद्र देशमुख, सोलापूरदेशातील असहिष्णू वातावरणाचे खापर केंद्र सरकारवर फोडून, साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले जात आहेत, पण सोलापुरातील ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार आणि ख्यातनाम लेखक प्रा. निशिकांत ठकार यांनी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांच्या भूमिकेवर असहमती दर्शविली आहे. साहित्य अकादमी ही स्वायत्त संस्था असून, सरकारशी तिचा संबंध नाही. त्यामुळे पुरस्कार परत करणे अर्थहीन आहे, असे मत या दोन मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.डॉ. गो. मा. पवार हे १० वर्षे अकादमीच्या कार्यकारिणीचे सदस्य होते, शिवाय २००७ साली त्यांच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरील चरित्र ग्रंथास अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. ‘केंद्राचा निषेध करण्यासाठी पुरस्कार परत करणे, केवळ सनसनाटी ठरू शकते, पण ते अर्थपूर्ण नाही. ही संस्था स्वायत्त आहे. पुरस्कारांची निवड करणाऱ्या समितीमध्ये देशातील विद्वानांचा समावेश आहे. सरकारचा यामध्ये कोणताही हस्तक्षेप नसतो,’ असे त्यांनी सांगितले.‘काही साहित्यिकांनी राज्य शासनाचा पुरस्कारही परत करण्यास सुरुवात केली आहे, पण त्यांना मिळालेले पुरस्कार आधीच्या शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाही चुकीची वाटते,’ असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.प्रा. ठकार यांनी हिंदीतील अनेक ग्रंथ मराठीत आणले आहेत. २०१४मध्ये त्यांना अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ते म्हणाले की, ‘यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. तेव्हा कुणी पुरस्कार परत केले नव्हते.’ साहित्य अकादमी ही संपूर्ण स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे पुरस्कार परत करण्याचे काहीच कारण नाही. (प्रतिनिधी)>> केंद्र सरकार प्रतिगाम्यांना पाठीशी घालत आहे, हे अद्याप सिद्ध व्हायचे आहे. ज्या घटना घडल्या, त्यांचा तपास सुरू आहे. कोणतेही सत्य बाहेर येण्याआधीच मत बनविणे चुकीचे आहे.- डॉ. गो. मा. पवार, ज्येष्ठ समीक्षकआपण आजही मोकळेपणाने बोलू शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कसलीच गदा आलेली नाही. ती जेव्हा येईल, तेव्हा निश्चित भूमिका घेणे योग्य ठरेल, असे मला वाटते.- प्रा. निशिकांत ठकार