शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु : हवामान विभागाकडून जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 9:30 PM

देशात सध्या मॉन्सून कर्नाटक, तामिळनाडु आणि केरळ मध्ये सक्रिय असून उत्तर भारत, पूर्व भारतातील बहुतांश ठिकाणी त्याचे प्रमाण कमी झाले आहे़. 

ठळक मुद्देगोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यताशनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊसगेल्या तीन वर्षांपासून त्याचा माघारीचा प्रवास काहीसा उशिरा सुरु

पुणे : मान्सूनने आपल्या परतीचा प्रवास सुरु केला असून राजस्थान, कच्छ व उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून तो माघारी परतल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केले आहे़. गेल्या वर्षी २०१७ मध्ये मॉन्सूनच्या माघारीला २७ सप्टेंबरला सुरुवात झाली होती व तो संपूर्ण देशातून २५ आॅक्टोबरला माघारी गेला होता़.

शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडला़. मराठवाड्यात हवामान कोरडे होते़ पेण १२०, कर्जत ६०, माथेरान, वैभववाडी ५०, भिवंडी, दाभोलीम, कुडाळ, मुल्दे, केपे, संगमेश्वर, देवरुख ३० मिमी पावसाची नोंद झाली होती़. मध्य महाराष्ट्रात श्रीरामपूर ४०, आजरा, चंदगड, गडहिग्लज, कोरेगाव, नेवासा, पेठ, संगमनेर, वडगाव मावळ ३० मिमी पाऊस झाला होता़. देशात सध्या मॉन्सून कर्नाटक, तामिळनाडु आणि केरळ मध्ये सक्रिय असून उत्तर भारत, पूर्व भारतातील बहुतांश ठिकाणी त्याचे प्रमाण कमी झाले आहे़.  येत्या २४ तासात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतचा समुद्र खवळलेला असण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असून सर्वसाधारणपणे मॉन्सूनच्या परतीचा प्रवास १ सप्टेंबरपासून सुरु होत असतो़. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून त्याचा माघारीचा प्रवास काहीसा उशिरा सुरु होऊ लागला आहे़. २०१७ मध्ये मान्सूनची माघारी २७ सप्टेंबरपासून सुरु झाली़. महाराष्ट्रातून तो २४ आॅक्टोबरला माघारी गेला आणि संपूर्ण देशातून २५ आॅक्टोबरला परतला होता़. २०१६ मध्ये त्यांच्या माघारीस १५ सप्टेंबरला सुरु झाली़. महाराष्ट्रातून तो १६ आॅक्टोंबरला आणि संपूर्ण देशातून २८ आॅक्टोंबरला माघारी गेला होता़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसVidarbhaविदर्भRajasthanराजस्थानGujaratगुजरात