शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

बारावीच्या निकालाचे सूत्र अद्याप ठरेना, शिक्षण विभागाच्या अध्यादेशाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 07:24 IST

राज्यातील सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांचे इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. सीबीएसई व आयसीएसई बोर्डाने सुद्धा बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु, कोणत्याही बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे सूत्र जाहीर केले नाही.

पुणे : कोरोनामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, बारावीचा निकाल कोणत्या सूत्रानुसार जाहीर करावा, हे अद्याप ठरलेले नाहीत. राज्य शासनाकडून अध्यादेश प्रसिद्ध केल्यानंतरच शिक्षण विभागाकडून निकालाची पुढील कार्यवाही सुरू होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभाग अध्यादेशाची वाट पाहत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

राज्यातील सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांचे इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. सीबीएसई व आयसीएसई बोर्डाने सुद्धा बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु, कोणत्याही बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे सूत्र जाहीर केले नाही. सीबीएसई बोर्डाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या सूत्राचा अवलंब राज्य मंडळाकडून केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, केवळ अंतर्गत मूल्यमापनावर बारावीचा निकाल जाहीर करणे उचित ठरणार नाही. बारावीच्या गुणांवर पदवी व इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असते. त्यामुळे बारावीसाठी कोणत्या मूल्यमापनाचा अवलंब केला जातो, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

राज्य मंडळाने इयत्ता दहावीच्या निकालाचा आराखडा व वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात मुख्याध्यापकांची कर्तव्ये तसेच नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी परीक्षार्थी आदी विद्यार्थ्यांचे निकाल कोणत्या पद्धतीने तयार करावेत, यासंदर्भातील सविस्तर सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. दहावीचा निकाल प्रसिद्ध करण्यासाठी राज्य मंडळाला बरीच तयारी करावी लागली. बारावीचा निकाल तयार करण्यासाठीसुद्धा याच पद्धतीने आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यामुळे इयत्ता बारावीचा निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षण