शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

मराठा आरक्षणाला पुन्हा आव्हान; चेंडू हायकोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 06:29 IST

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या आधारे मराठा समाजास सरकारी नोकऱ्या व शिक्षणाच्या प्रवेशांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्यास सरकारने केलेल्या नव्या कायद्याला सोमवारी उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

मुंबई : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या आधारे मराठा समाजास सरकारी नोकऱ्या व शिक्षणाच्या प्रवेशांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्यास सरकारने केलेल्या नव्या कायद्याला सोमवारी उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. गुरुवारी विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या कायद्यास राज्यपालांची संमती मिळताच शनिवारपासून तो लागू झाला. त्यानंतर लगोलग ‘इंडियन कॉन्स्टिट्युशनॅलिस्ट कौन्सिल’ या संस्थेतर्फे अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी या कायद्यास आव्हान देणारी रिट याचिका केली. याआधी मराठा आरक्षणाच्या २०१४-१५ मधील कायद्यासही इतरांसोबत या संस्थेनेही आव्हान दिले होते.राज्यात आधीपासूनच ५२ टक्के आरक्षण लागू होते. त्याला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आल्याबद्दल प्रामुख्याने आव्हान दिले गेले आहे. ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण हे ‘उलट पक्षपात’ (रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन) असल्याने ते बिगरमागासवर्गीय घटकांवर अन्याय करणारे आहे, असे याचिका म्हणते. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासभेत केलेल्या भाषणाचा संदर्भ देण्यात आला आहे.याचिका म्हणते की, राज्यघटनेत ज्या सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर आरक्षण देणे अभिप्रेत आहे ते मागासलेपण इतरांनी पिढीजात केलेल्या अन्यायामुळे असणे अभिप्रेत आहे. मराठा समाजाचे मागासलेपण या निकषात बसणारे आहे, असा निष्कर्ष काढण्यास सबळ आधार मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींमध्ये दिसत नाही. याचिकेत असाही आक्षप घेण्यात आला आहे की, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींखेरीज ‘ओबीसीं’ना दिलेले आरक्षण सामाजिक मागासलेपणावरच दिलेले आहे. त्यामुळे त्याच निकषावर मराठा समाजाचा वेगळा वर्ग करणे घटनाबाह्य आहे.मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील आकडेवारी पाहिली तर ती मराठा समाजाच्या सामाजिक नव्हे तर आर्थिक मागासलेपणाकडे अधिक संकेत करणारी आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण नव्हे तर सवलती दिल्या जाऊ शकतात, असे याचिकेत म्हटले आहे. आधीच्या आरक्षणाच्या कायद्यास न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती. नवा कायदा लागू झाल्यानंतर जुना कायदा रद्द झाला. मात्र त्यानुसार दिलेल्या नोकºया व प्रवेश अबाधित ठेवण्यात आले. यासही याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. जुन्या प्रलंबित याचिकेवर बुधवारी सुनावणी अपेक्षित आहे.>सुप्रीम कोर्टात कॅव्हिएटइकडे उच्च न्यायालयात ही याचिका केली जात असताना महाराष्ट्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केला. सरकारचे स्थायी वकील अ‍ॅड. निशांत कातनेश्वरकर यांनी केलेल्या या अर्जात मराठा आरक्षणाच्या ताज्या कायद्याविरुद्ध कोणी याचिका केल्यास सरकारचे म्हणणे ऐकल्याखेरीज कोणताही अंतरिम आदेश दिला जाऊ नये, अशी विनंती आहे.>याचिका करणा-यांना आले १५०हून अधिक धमकीचे फोनही याचिका केली जाणार आहे याची कुणकुण लागल्यापासून व प्रत्यक्षात याचिका केल्यानंतर अ‍ॅड. जयश्री पाटील व त्यांचे पती अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना धमकीचे १५०हून अधिक फोन आले. हे सर्व फोन या दाम्पत्याने टॅप करून ठेवले आहेत. या धमक्या सकल मराठा समाज आंदोलनाच्या कार्यकर्त्यांकडून आल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHigh Courtउच्च न्यायालय