शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

मराठा आरक्षणाला पुन्हा आव्हान; चेंडू हायकोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 06:29 IST

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या आधारे मराठा समाजास सरकारी नोकऱ्या व शिक्षणाच्या प्रवेशांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्यास सरकारने केलेल्या नव्या कायद्याला सोमवारी उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

मुंबई : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या आधारे मराठा समाजास सरकारी नोकऱ्या व शिक्षणाच्या प्रवेशांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्यास सरकारने केलेल्या नव्या कायद्याला सोमवारी उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. गुरुवारी विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या कायद्यास राज्यपालांची संमती मिळताच शनिवारपासून तो लागू झाला. त्यानंतर लगोलग ‘इंडियन कॉन्स्टिट्युशनॅलिस्ट कौन्सिल’ या संस्थेतर्फे अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी या कायद्यास आव्हान देणारी रिट याचिका केली. याआधी मराठा आरक्षणाच्या २०१४-१५ मधील कायद्यासही इतरांसोबत या संस्थेनेही आव्हान दिले होते.राज्यात आधीपासूनच ५२ टक्के आरक्षण लागू होते. त्याला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आल्याबद्दल प्रामुख्याने आव्हान दिले गेले आहे. ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण हे ‘उलट पक्षपात’ (रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन) असल्याने ते बिगरमागासवर्गीय घटकांवर अन्याय करणारे आहे, असे याचिका म्हणते. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासभेत केलेल्या भाषणाचा संदर्भ देण्यात आला आहे.याचिका म्हणते की, राज्यघटनेत ज्या सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर आरक्षण देणे अभिप्रेत आहे ते मागासलेपण इतरांनी पिढीजात केलेल्या अन्यायामुळे असणे अभिप्रेत आहे. मराठा समाजाचे मागासलेपण या निकषात बसणारे आहे, असा निष्कर्ष काढण्यास सबळ आधार मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींमध्ये दिसत नाही. याचिकेत असाही आक्षप घेण्यात आला आहे की, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींखेरीज ‘ओबीसीं’ना दिलेले आरक्षण सामाजिक मागासलेपणावरच दिलेले आहे. त्यामुळे त्याच निकषावर मराठा समाजाचा वेगळा वर्ग करणे घटनाबाह्य आहे.मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील आकडेवारी पाहिली तर ती मराठा समाजाच्या सामाजिक नव्हे तर आर्थिक मागासलेपणाकडे अधिक संकेत करणारी आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण नव्हे तर सवलती दिल्या जाऊ शकतात, असे याचिकेत म्हटले आहे. आधीच्या आरक्षणाच्या कायद्यास न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती. नवा कायदा लागू झाल्यानंतर जुना कायदा रद्द झाला. मात्र त्यानुसार दिलेल्या नोकºया व प्रवेश अबाधित ठेवण्यात आले. यासही याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. जुन्या प्रलंबित याचिकेवर बुधवारी सुनावणी अपेक्षित आहे.>सुप्रीम कोर्टात कॅव्हिएटइकडे उच्च न्यायालयात ही याचिका केली जात असताना महाराष्ट्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केला. सरकारचे स्थायी वकील अ‍ॅड. निशांत कातनेश्वरकर यांनी केलेल्या या अर्जात मराठा आरक्षणाच्या ताज्या कायद्याविरुद्ध कोणी याचिका केल्यास सरकारचे म्हणणे ऐकल्याखेरीज कोणताही अंतरिम आदेश दिला जाऊ नये, अशी विनंती आहे.>याचिका करणा-यांना आले १५०हून अधिक धमकीचे फोनही याचिका केली जाणार आहे याची कुणकुण लागल्यापासून व प्रत्यक्षात याचिका केल्यानंतर अ‍ॅड. जयश्री पाटील व त्यांचे पती अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना धमकीचे १५०हून अधिक फोन आले. हे सर्व फोन या दाम्पत्याने टॅप करून ठेवले आहेत. या धमक्या सकल मराठा समाज आंदोलनाच्या कार्यकर्त्यांकडून आल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHigh Courtउच्च न्यायालय