‘हिरव्या आणि भगव्या रंगावरून काही शक्तींचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 12:24 IST2026-01-26T12:22:01+5:302026-01-26T12:24:04+5:30

Harshavardhana Sapkal News: तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत.

Republic Day 2026: Harshvardhan Sapkal criticizes 'A ploy by some forces to achieve political interests through the colors green and saffron' | ‘हिरव्या आणि भगव्या रंगावरून काही शक्तींचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 

‘हिरव्या आणि भगव्या रंगावरून काही शक्तींचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 

मुंबई - तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व संविधानवादी लोकांनी मात्र भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात संपन्न झाला. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रफुल्ल गुडदे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस जोजो थ़ॉमस, झिशान अहमद, श्रुती म्हात्रे यांच्यासह काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याचा लढा व स्वातंत्र्यानंतर देश उभारणीत काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे, ही एक मोठी साधना आहे आणि साधनेला संघर्षाची जोड आहे. संघर्षाचा हा मुलमंत्र आपण जपला पाहिजे. आज देशात काही शक्ती जातीपातीचे, धर्माचे राजकारण करत आहेत. कोणाला हिरव्या रंगाचे तर कोणाला भगव्या रंगाचे राजकारण करायचे आहे. हिरवा व भगवा या रंगाचा आदरच आहे. हिरवा रंग सुबत्तेचे तर भगवा रंग हा त्यागाचे, सन्मानाचे प्रतिक आहे, तिरंगा हा एक विचार आहे, स्वप्न आहे त्यासाठी आम्ही आजही रक्त सांडण्यास तयार आहोत असे सपकाळ म्हणाले.

भारतीय जनता पक्ष व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मोहम्मद अली जिना यांच्या पक्षाबरोबर जनसंघाने निवडणुका लढवल्या व त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केले, त्या सरकारमध्ये जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते, आज त्याचे पुनरुज्जीवन केले जात आहे, असेही सपकाळ म्हणाले.

Web Title : राजनीतिक स्वार्थ के लिए रंगों का शोषण; कांग्रेस ने तिरंगा अपनाने का आग्रह किया।

Web Summary : हर्षवर्धन सपकाल ने राजनीतिक लाभ के लिए हरे और केसरिया रंग का उपयोग करने की आलोचना की, कांग्रेस कार्यकर्ताओं से तिरंगे को बढ़ावा देने और सामाजिक सद्भाव बनाए रखने का आग्रह किया। उन्होंने भाजपा और एमआईएम पर विभाजनकारी राजनीति का आरोप लगाया, और ऐतिहासिक गठबंधनों पर प्रकाश डाला।

Web Title : Political motives exploit colors; Congress urges tricolor embrace.

Web Summary : Harsvardhan Sapkal criticized using green and saffron for political gain, urging Congress workers to promote the tricolor and uphold social harmony. He accused BJP and MIM of divisive politics, highlighting historical alliances.