शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नाशिक, परभणी, औरंगाबादमध्ये विक्रमी कमाल तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 04:01 IST

उष्णतेच्या तीव्र लाटेने महाराष्ट्र सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी होरपळला. अकोला येथे पुन्हा सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस अशा जगातील विक्रमी तापमानाची नोंद झाली.

पुणे : उष्णतेच्या तीव्र लाटेने महाराष्ट्र सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी होरपळला. अकोला येथे पुन्हा सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस अशा जगातील विक्रमी तापमानाची नोंद झाली. राज्यातील अनेक शहरांमधील कमाल तापमानाचा विक्रमही मोडला गेला आहे़

औरंगाबादमध्ये ६१ वर्षापूर्वीच्या सर्वाधिक कमाल तापमानाची बरोबरी झाली आहे़ नाशिकमध्येही ६१ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला गेला़ परभणीमध्ये आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. पुढील चार दिवस विदर्भातील बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

औरंगाबादमध्ये ४३़६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ यापूर्वी २६ एप्रिल १९५८ रोजी ४३़६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती़ तर १७ एप्रिल २०१० रोजी औरंगाबादमध्ये ४३़५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़नाशिकमध्ये उच्चांकी ४२़७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. यापूर्वी नाशिकमध्ये २४ एप्रिल १९५८ रोजी ४२़२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़ परभणी येथेही आजवरचे विक्रम मोडत ४५़२ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती़ यापूर्वी २१ व २२ एप्रिल २०१६ मध्ये ४५़१ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले होते़ तो विक्रम आज मोडला गेला़

उस्मानाबाद येथे ४३़६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ शहराच्या आजवरच्या इतिहासात हे दुसºया क्रमांकाचे तापमान आहे़ यापूर्वी तेथे २२ एप्रिल २०१६ रोजी ४३़८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़याबरोबरच अनेक शहरांमधील कमाल तापमान सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिक होते. ही परिस्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे़

अकोल्यात युवकाचा बळीउष्णतेच्या लाटेचा सर्वात जास्त चटका विदर्भाला बसला आहे. जगातील उच्चांकी तापमान नोंदले गेलेल्या अकोल्यात शनिवारी उष्माघाताने एका युवकाचा मृत्यू झाला. शेषराव नामदेव जवरे असे मृताचे नाव आहे. दोन महिलांनाही उष्माघाताचा फटका बसला असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत 

जळगावचा चटका ४७ अंश सारखाउष्णतेच्या लाटेत खान्देशही भाजून निघाला असून खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार जळगावचा पारा ४७ अंशावर पोहचला होता. अधिकृत हवामान केंद्रावर ४५़ ६ अंश सेल्सियसची नोंद झाली.

चार दिवसानंतर नागपूरात ४७ डिग्रीचार दिवसानंतर नागपुरातील तापमान ४७ डिग्री सेल्सिअसवर पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, ऑरेंज अलर्टचा परिणाम नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये दिसायला लागला आहे

राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : अकोला ४६.७, अमरावती ४६, बुलडाणा ४३.३, ब्रम्हपुरी ४६.४, चंद्रपूर ४६.५, गोंदिया ४३, नागपूर ४५.३, वाशिम ४४.६, वर्धा ४६, यवतमाळ ४५.२. पुणे ४२.९, अहमदनगर ४५.१, जळगाव ४५, कोल्हापूर ३९.९, मालेगाव ४४.६, सातारा ४१.५, सोलापूर ४३.१, मुंबई ३४, रत्नागिरी ३२.६,उस्मानाबाद ४३.६, औरंगाबाद ४३.६, बीड ४४.२.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMaharashtraमहाराष्ट्रAkolaअकोलाNashikनाशिकparabhaniपरभणीAurangabadऔरंगाबाद