शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक, परभणी, औरंगाबादमध्ये विक्रमी कमाल तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 04:01 IST

उष्णतेच्या तीव्र लाटेने महाराष्ट्र सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी होरपळला. अकोला येथे पुन्हा सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस अशा जगातील विक्रमी तापमानाची नोंद झाली.

पुणे : उष्णतेच्या तीव्र लाटेने महाराष्ट्र सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी होरपळला. अकोला येथे पुन्हा सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस अशा जगातील विक्रमी तापमानाची नोंद झाली. राज्यातील अनेक शहरांमधील कमाल तापमानाचा विक्रमही मोडला गेला आहे़

औरंगाबादमध्ये ६१ वर्षापूर्वीच्या सर्वाधिक कमाल तापमानाची बरोबरी झाली आहे़ नाशिकमध्येही ६१ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला गेला़ परभणीमध्ये आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. पुढील चार दिवस विदर्भातील बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

औरंगाबादमध्ये ४३़६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ यापूर्वी २६ एप्रिल १९५८ रोजी ४३़६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती़ तर १७ एप्रिल २०१० रोजी औरंगाबादमध्ये ४३़५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़नाशिकमध्ये उच्चांकी ४२़७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. यापूर्वी नाशिकमध्ये २४ एप्रिल १९५८ रोजी ४२़२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़ परभणी येथेही आजवरचे विक्रम मोडत ४५़२ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती़ यापूर्वी २१ व २२ एप्रिल २०१६ मध्ये ४५़१ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले होते़ तो विक्रम आज मोडला गेला़

उस्मानाबाद येथे ४३़६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ शहराच्या आजवरच्या इतिहासात हे दुसºया क्रमांकाचे तापमान आहे़ यापूर्वी तेथे २२ एप्रिल २०१६ रोजी ४३़८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़याबरोबरच अनेक शहरांमधील कमाल तापमान सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिक होते. ही परिस्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे़

अकोल्यात युवकाचा बळीउष्णतेच्या लाटेचा सर्वात जास्त चटका विदर्भाला बसला आहे. जगातील उच्चांकी तापमान नोंदले गेलेल्या अकोल्यात शनिवारी उष्माघाताने एका युवकाचा मृत्यू झाला. शेषराव नामदेव जवरे असे मृताचे नाव आहे. दोन महिलांनाही उष्माघाताचा फटका बसला असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत 

जळगावचा चटका ४७ अंश सारखाउष्णतेच्या लाटेत खान्देशही भाजून निघाला असून खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार जळगावचा पारा ४७ अंशावर पोहचला होता. अधिकृत हवामान केंद्रावर ४५़ ६ अंश सेल्सियसची नोंद झाली.

चार दिवसानंतर नागपूरात ४७ डिग्रीचार दिवसानंतर नागपुरातील तापमान ४७ डिग्री सेल्सिअसवर पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, ऑरेंज अलर्टचा परिणाम नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये दिसायला लागला आहे

राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : अकोला ४६.७, अमरावती ४६, बुलडाणा ४३.३, ब्रम्हपुरी ४६.४, चंद्रपूर ४६.५, गोंदिया ४३, नागपूर ४५.३, वाशिम ४४.६, वर्धा ४६, यवतमाळ ४५.२. पुणे ४२.९, अहमदनगर ४५.१, जळगाव ४५, कोल्हापूर ३९.९, मालेगाव ४४.६, सातारा ४१.५, सोलापूर ४३.१, मुंबई ३४, रत्नागिरी ३२.६,उस्मानाबाद ४३.६, औरंगाबाद ४३.६, बीड ४४.२.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMaharashtraमहाराष्ट्रAkolaअकोलाNashikनाशिकparabhaniपरभणीAurangabadऔरंगाबाद