शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत मेरीटाईमचे उपकेंद्र होणार

By admin | Updated: February 18, 2015 23:46 IST

येथील बंदरांचा विकास तर होईलच, शिवाय येथील विद्यार्थ्याना संबंधित अभ्यासक्रमांसाठी परराज्यात जावे लागणार नाही.

रत्नागिरी : भारतीय मेरीटाईम बोर्डाने रत्नागिरीमध्ये उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे या ठिकाणी नौदल प्रमाणपत्र व प्रशिक्षण देणारे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील बंदरांचा विकास तर होईलच, शिवाय येथील विद्यार्थ्याना संबंधित अभ्यासक्रमांसाठी परराज्यात जावे लागणार नाही.केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी रत्नागिरीत कार्यक्रमासाठी आले असता, त्यांच्याकडे मेरीटाईम उपकेंद्र सुरू करण्याविषयी मागणी करण्यात आली होती. मागणीसंदर्भात नामदार गडकरी यांनी याबाबत लक्ष घालून संबंधित उपकेंद्र सुरू करण्यास दुजोरा दिला आहे. उपकेंद्राला लागणारी जागा पाहण्यात आली आहे. मेरीटाईम विद्यापिठाचे संचालक जे. के.धर यांनी रत्नागिरीला भेट देऊन जागेची पाहणी केली आहे. समुद्र किनाऱ्यालगत सुमारे १५ एकर जागेची आवश्यकता असल्याने जयगड, व पावस रोड, व रत्नागिरीतील काही जागांची पाहणी करण्यात आली आहे.समुद्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या तरूणांना उपयुक्त असे २ ते ३ वर्षाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या मंडळींना आवश्यक असणारे अभ्यासक्रम वा प्रशिक्षण देणारे याठिकाणी छोटे मोठे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले, तर येथील मंडळींना गोवा किंवा केरळ सारख्या राज्यात जाऊन प्रशिक्षण किंवा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार नाही.जिल्ह्यातील बंदरांचा विकास झाला किंवा सुससज्ज बंदरे उभारली गेली, तर सागरी मालवाहतूक सुरू होईल. रस्त्यांमुळे मालवाहतूकीस होणारा वाढता इंधन खर्च, वाहनांची झीज, शिवाय लागणारा वेळ त्याचप्रमाणे वेळेत न पोहोचल्यामुळे मालाचे होणारे नुकसान आदी बाबी विचारात घेता सागरी वाहतूक निश्चितच उपयुक्त व रास्त दरातील आहे. कोकणात अनेक नवीन कंपन्या येऊ घातल्या आहेत. त्यामुळे भविष्यात सागरी वाहतूकीचा विकास होणे गरजेचे आहे. जयगड येथील जिंदल कंपनीमुळे कोकण रेल्वे ते जयगड रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे. डिंगणी ते जयगड मार्ग जोडण्यासाठी ७७५ कोटीचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्याप्रमाणे जर कोल्हापूर जिल्हा कोकणास जोडण्याकरीता कोल्हापूर ते वैभववाडी मार्ग रेल्वेने जोडण्यात आला, तर निश्चितच त्याचा फायदा होईल. रेल्वेमुळे रस्त्यावरील अवजड वाहतूक कमी होईल. शिवाय सुरक्षित कमी खर्चाने वाहतूक शक्य होईल. पुढे हीच वाहतूक सागरी मार्गाला जोडल्यास त्याचा फायदा होईल. कार्गो वाहतुकीमुळे निर्यातदारांना फायदा होईल. बंदरांचा विकास झाला तरच कार्गो वाहतूक विकसित होणार आहे. सध्या बंदरांची ६ ते ७ मिलियन टन कार्गो वाहतूक क्षमता आहे. मात्र, भविष्यात ती ५० मिलियन्स टन पेक्षाही वाढू शकते. त्याला मेरीटाईम उपकेंद्राचा मोठा हातभार लागेल. जेणेकरून बंदरांशी संबंधित अभ्यासक्रमांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)