शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

...अन् रामदास कदमांनी फडणवीसांना थेट 'काळजीवाहू मुख्यमंत्री' संबोधले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 7:22 PM

सुरवातीला कदम यांनी बैठकीचा विषय स्पष्ट करताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण बैठकीला उपस्थित राहत असल्याचे सांगितले.

मुंबई: अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. यामध्ये शिवसेनेचे सहा मंत्रीही सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारपरिषदेमध्ये शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री संबोधल्याने नवी चर्चा रंगली आहे.

सुरवातीला कदम यांनी बैठकीचा विषय स्पष्ट करताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण बैठकीला उपस्थित राहत असल्याचे सांगितले. कारण शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. असे असताना शिवसेना अनुपस्थित राहिली असे व्हायला नको, असेही त्यांनी सांगत बैठकीतील वृत्तांत सांगितला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. यामध्ये शिवसेनेचे मंत्रीही सहभागी झाल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सत्तेच्या गुऱ्हाळावरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची ही बैठक असल्याचे शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावर सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दिला आहे, असे म्हटले. 10 हजार कोटींची मदत अत्यंत कमी आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आकड्यानुसार ही मदत 17 हजार कोटींच्या पलिकडे जाते. यामुळे तेवढी मदत करावी अशी मागणी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केल्याचे कदम यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोणाचा यावरून शिवसेना-भाजपामध्ये कलगीतुरा रंगला असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून परस्परविरोधी विधाने केली जात आहेत. यातच सामनाच्या अग्रलेखात मुख्यमंत्र्यांसाठी मावळते असा शब्द प्रयोग करण्यात आला होता. यानंतर आज शिवसेनेच्या एका मंत्र्यानेच फडणवीसांना मावळते मुख्यमंत्री म्हटल्याने आता थेट फडणवीसांवरच टीकेचे बाण सोडण्यास सुरूवात झाली आहे. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेना