रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 20:12 IST2025-08-10T20:12:06+5:302025-08-10T20:12:06+5:30
Ramdas Athawale News: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पीएम मोदींशी फोनवर चर्चा केली.

रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
Ramdas Athawale News: केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे प्रमुख रामदास आठवलेमहाराष्ट्र भाजपवर नाराज आहेत. त्यांनी शनिवारी (९ ऑगस्ट) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोलून आपली नाराजी व्यक्त केली. आठवले म्हणाले की, काल मी पंतप्रधान मोदींशी सुमारे १० मिनिटे बोललो. मी त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल माझे म्हणणे मांडले.
मीडियाशी संवाद साधताना आठवले स्पष्टपणे म्हणाले की, आरपीआयला महाराष्ट्रात कोणतेही मंत्रिपद मिळाले नाही किंवा सत्तेत विशेष भूमिका मिळाली नाही. महाराष्ट्रात आम्हाला मंत्रीपद मिळायला हवे होते, परंतु राज्यातील भाजप युनिटने आम्हाला दिले नाही. यामुळे आमच्या समाजात नाराजी आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर आधीच चर्चा केली आहे. आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्या पक्षाला जागा मिळाव्या, अशी मागणी त्यांनी केली.
Mumbai, Maharashtra: Union Minister Ramdas Athawale says, "Yesterday, I spoke with PM Modi for about 10 minutes. I asked him about what is happening in our party and expressed our dissatisfaction regarding Maharashtra. I explained that in Maharashtra, the RPI is not receiving any… pic.twitter.com/O6QHK3g21x
— IANS (@ians_india) August 10, 2025
यावेळी आठवले यांनी यावर भर दिला की, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आरपीआयदेखील महायुतीचा एक भाग आहे. त्यामुळे, आम्हाला देखील महायुतीमध्ये समान वाटा मिळाला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाला महामंडळांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावे. आम्हाला दोन महामंडळांचे अध्यक्षपद आणि सुमारे ६०-७० महामंडळात सदस्यत्व मिळावेत, अशी मागणीही आठवलेंनी यावेळी केली.