शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

Coronavirus: राज्यातील नाइट कर्फ्यूबाबत ठाकरे सरकार विचाराधीन; राजेश टोपे यांचे मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 22:22 IST

ठाकरे सरकार आता रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेलराज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहेराजेश टोपे यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण कमालीचे वाढताना पाहायला मिळत आहे. यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे का, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. केरळनंतर महाराष्ट्रात रुग्णवाढ आढळून आली असून, केंद्र सरकारने राज्य सरकारांना याबाबत काही सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आता रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (rajesh tope says thackeray govt is considering night curfew in the state)

“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला

देशातील ४१ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गदर असून, करोनाची दुसरी लाट अजूनही कायम आहे. केरळ व महाराष्ट्राने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुलनेत अधिक प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल. राज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे राजेश टोपे यांनी नमूद केले आहे. 

“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा

शिक्षकांचे लसीकरण करणे अत्यंत आवश्यक

राज्यात शाळा सुरू करायच्या असतील तर शिक्षकांचे लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांनी दोन्ही डोस घेतलेले असतील तर शाळा सुरू करणे शक्य होणार आहे. यासाठी आता राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. याचाच एक भाग म्हणून शिक्षकांचे लसीकरण करण्याबाबत विशेष मोहीम हाती घेण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे, असे राजेश टोपे म्हणाले. केरळमध्ये ओणम उत्सवामध्ये ३० ते ३५ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. हे पाहता आपल्याला सावध होण्याची आवश्यकता असल्याचे टोपे यांनी सांगितले.

वेगात वाढ व वेळेची बचत होणार! रेल्वे ८ हजार ट्रेनच्या वेळा बदलणार, IIT मुंबईची घेणार मदत

दरम्यान, राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे. त्यासाठी अधिक लसमात्रांची गरज असेल तर तातडीने केंद्राकडून अपेक्षित लसमात्रा राज्यांना पुरवल्या जातील, असे केंद्रीय गृहसचिवांनी राज्यांना सांगितले होते. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे व सणासुदींच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी टाळली पाहिजे, असेही केंद्र सरकारने राज्यांना स्पष्ट केले होते. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपेUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकार