शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

ऐनवेळी बदलला राहुल यांनी प्लान

By admin | Updated: May 1, 2015 02:08 IST

अमरावती जिल्ह्णात आयोजित किसान पदयात्रेत सहभागी होण्यासाठी अ.भा.काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नागपुरातून कारने जायचे की रेल्वेने हे गुरुवारी पहाटे ४ पर्यंत निश्चित नव्हते.

रेल्वे प्रवासाचा होता विचार : नियोजन कोलमडले असतेनागपूर : अमरावती जिल्ह्णात आयोजित किसान पदयात्रेत सहभागी होण्यासाठी अ.भा.काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नागपुरातून कारने जायचे की रेल्वेने हे गुरुवारी पहाटे ४ पर्यंत निश्चित नव्हते. सकाळच्या रेल्वेने धामणागाव पर्यंत जाता येईल का, याची चाचपणी बुधवारी करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी नियोजित वेळापत्रक कोलमडू नये म्हणून प्रवासातील बदल टाळण्यात आला व राहुल गांधी हे कारनेच अमरावतीसाठी रवाना झाले. ऐनवेळी राहुल गांधी हे पहाटे ५.४० ची नागपूर-भुसावळ पॅसेंजर किंवा सकाळी ६.३६ ला सुटणारी जबलपूर-अमरावती एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांपैकी एकाने धामणगावपर्यंत जाऊ शकतात, अशी शक्यता काँग्रेस पदाधिकारी वर्तवित होते. याशिवाय सेवाग्राम येथे सकाळी रेल्वे पोहचून बापुकुटीचे दर्शन घ्यायचे व नंतर पुढील प्रवास सुरू करायचा, असाही विचार पुढे आला होता. असे झाले तर राहुल यांचा विदर्भातील प्रवास रेल्वे, कार व पायी असा तिन्ही प्रकारे होईल. तीन वेगवेगळ्या प्रवासातून वेगवेगळ्या नागरिकांशी संवाद साधता येईल व तो जास्त परिणामकारक असेल, असा विचार काही काँग्रेस नेत्यांनी मांडला होता. मात्र, अमरावती जिल्ह्णातील ज्या गावांना व शेतकरी कुटुंबांना राहुल गांधी भेट देणार आहेत तेथे दोन दिवसांपूर्वीच वेळेसह निरोप देण्यात आले आहेत. धामणगावपर्यंत रेल्वेने प्रवास केला तर पुढचे वेळापत्रक कोलमडेल. शिवाय अमरावती मार्गावर रस्त्यात काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागताची तयारी करून ठेवली होती. तसे निरोप ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविले होते. अशात ऐनवेळी कार प्रवास रद्द करून रेल्वे प्रवास केला तर संबंधित कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा हिरमोड होईल व यातून चांगले संकेत जाणार नाहीत, असे काही पदाधिकाऱ्यांचे मत होते. शिवाय ऐनवेळी दौऱ्यात बदल केला तर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे शेवटी रेल्वे प्रवास टाळून नियोजित कार्यक्रमानुसार कारनेच जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी रणरणत्या उन्हात अमरावतीतील गुंजी ते रामगावपर्यंत १५ किमीची पदयात्रा करून आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. तेथील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी चर्चा केली. ह्यकर्जाच्या ओज्याने पिचलेले अनेक शेतकरी आत्महत्या करत असताना काही मंत्री मात्र तीनच शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा दावा करतात तर काही जण त्या शेतक-यांची भेकड म्हणून अवहलेना करतातह्ण असे सांगत त्यांनी भाजपच्या मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. शेतकरी कर्जमाफीची मागणी करत असताना राज्य व केंद्र सरकार मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे सरकार शेतकरी वा मजुरांचे नव्हे तर उद्योगपतींचे सरकार असल्याची घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली. (प्रतिनिधी)