शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

तरुणाईची लगीनघाई! असला नवरा/नवरी नको गं बाई...

By सायली शिर्के | Updated: May 16, 2019 16:19 IST

लग्नाचं बघू, पण अटी-शर्ती लागू... बायको मिळत नाही म्हणून एका तरुणाने इच्छामरण मागितलंय. त्यावर तरुण-तरुणींना काय वाटतं?

लग्न हे प्रेमाचं बंधन असतं. लग्नामुळे आयुष्याला कलाटणी मिळते असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही पण हल्ली रिलेशनशीप, लग्न, संसार याबाबतची मतं तरुणाई जगासमोर ठामपणे मांडत आहे. 'शादी का लड्डू जो खाये वो पछताये, जो ना खाए वो भी पछताये' असं म्हटलं जातं तर वयात आलेल्या मुलामुलींना लग्न पाहावं करून असा सल्ला ही दिला जातो. पण हवी तशी मुलगीच मिळत नाही अशी अनेक तरुणांची तक्रार आहे. आईवडील आणि कुटुंबाचा सांभाळ करणारी बायको मिळत नाही म्हणून पुण्यातील एक तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. पण खरंच बायको म्हणजे रांधा वाढा उष्टी काढा, कुटुंब सांभाळा एवढंच तिचं आयुष्य असतं का?

आजकालच्या मुलामुलींचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. हल्ली तरुणाई आपल्या स्टेटसला मॅच होईल असाच जोडीदार शोधते. काहींना जबाबदाऱ्या, नातेवाईकांचा गोतावळा नको असतो तर काहींना याउलट अगदी कर्तव्यदक्ष, सर्वगुणसंपन्न बायको हवी असते. लग्नव्यवस्थेची पारंपरिक चौकट बदलण्याची खरंतर गरज आहे. लग्न म्हणजे adjustment, छोटी मोठी भांडणं, नाती सांभाळताना होणारी तारेवरची कसरत, एकमेकांना गृहीत धरणं हे नेहमीच समीकरण. अवाजवी अपेक्षा ही जोडीदाराकडून ठेवल्या जातात. लग्न म्हणजे नेमकं काय? बायको सुंदरच हवी का? किंवा नवरा कसा असावा? एकंदरीत लग्न या संकल्पनेबद्दल तरूणाईला काय वाटतं? नक्की बायको हवी की घरकाम करणारी बाई? या विषयी तरुणाईच्या डोक्यात काय विचारचक्र सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी मोकळेपणाने साधलेला संवाद...

आपल्याला हवी तशी जोडीदार मिळत नाही म्हणून पुण्यातील तरुणाने केलेला हा प्रयत्न वायफळ वाटतो. लग्न झाल्यावर सुरुवातीला सर्वकाही छान वाटतं नंतर मात्र त्या व्यक्तीच्या सहवासात राहून काही गोष्टी नावडत्या होतात. म्हणून मग अपेक्षा ठेऊन लोकांना काय सिद्ध करायचं असतं तेच माझ्या पचनी पडत नाही. कारण विनाकारण केलेल्या अपेक्षांनी दोन्हीं व्यक्तीचं आयुष्य पणाला लावलं जातं. लग्न संकल्पना समजून घेण्यासाठी संस्कारांचा ठेवा या पिढीला मिळायला हवा. अर्थात आपल्याला जोडीदार म्हणून कोण कसं आणि कधी हवं हे ठरवण्याचा वैयक्तिक अधिकार आहे.

- जाई कदम

 

लग्न ही आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मुलींनी देखील लग्नानंतर चूल आणि मूल या गोष्टीत अडकून राहू नये त्यांनी स्वत: चं वेगळं अस्तित्व निर्माण करावं. लग्न करताना मुलामुलींच्या अपेक्षा या हमखास वाढतात. पण लग्न ही काही काळासाठीची सोय नसल्याने दोघांनीही विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. सर्वच तरतुदी फायद्यासाठी नसतात. काही तरतुदी या अवघड परिस्थितीत उपाय म्हणून असतात. इच्छामरण हा एक उपायच आहे. त्यामुळे लग्नासाठी त्याचा दुरुपयोग कोणी करू नये. 

- विवेक साळुंखे

मुलामुलींच्या अपेक्षा या माझ्या मते काही योग्य आहेत तर काही अयोग्य आहेत. आजच्या काळात मुलगी नोकरी करत असली तरी हुंडा देणं, लग्नाचा पूर्ण खर्च करणं अशी मागणी लग्न करताना मुलीकडे केली जाते. तसेच नवऱ्या मुलाची आणि त्याच्या कुटुंबाची सुनेने काम करावं ही अपेक्षा असते पण ती वेळे अभावी पूर्ण करता येत नसल्याने तिची ओढाताण होते.  खरंतर सद्य परिस्थितीत कुटुंबाने आणि जोडप्याने एकमेकांना समजून घेतलं तरच सुखाने संसार करता येईल आणि घटस्फोटाच्या घटना कमी घडतील.

- शितल आसोलकर

 

स्वत: चं घर, एकुलता एक मुलगा, जास्त पगार, वेगळं राहायचं, मुलाचा फ्लॅट हवा, गाडी हवी अशा अनेक मुलींच्या अपेक्षा असतात. पण लग्न करताना जोडीदार हे एकमेकांना पूरक हवेत. मुलामुलींच्या लग्न करताना भरपूर अपेक्षा असतात. मात्र त्या दोघांनी मिळून पूर्ण करायला हव्यात तरच नातं घट्ट होतं. 

- राकेश कदम

 

मॅट्रीमोनीअल साईटवर मेंबर असल्याने तिथे अनेकजणांचे प्रोफाईल पाहता येतात. पण त्यातील अनेक मुलांची अपेक्षा ही आईला घरकामात मदत करणारी मुलगी हवी अशी असते. पण काम करणं ही अपेक्षा केवळ मुलींकडूनच का? तर त्याने देखील समजुतदारपणा दाखवावा. मुलगा आई-वडिलांना सांभाळू शकत नसेल, मुलीने त्यांची काळजी घ्यावी अशी त्याची इच्छा असेल तर तो त्या नवीन मुलीला कसं सांभाळून घेणार हा प्रश्नच आहे. अनेक मुलांची तक्रार असते की मुली पैसा पाहून लग्न करतात. पण असं असतंच असं नाही. प्रत्येक मुलीच्या या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत वेगळ्या अपेक्षा असतात.  

- उज्वला देसाई

लग्नाचा विचार करताना मी जॉईंट फॅमेलीला प्राधान्य देईन. कारण एकत्र कुटुंबपद्धतीत मोठ्यांचा सल्ला घेता येतो. तसेच वेळोवेळी त्याचं मार्गदर्शन मिळतं. अनेकदा मुलीने आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी अशी मुलाची इच्छा असते तशीच अपेक्षा मुलींची देखील मुलाकडून असते. लग्न करताना सर्वच गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे. काही मुलांना मुलीच्या चुकांचं खापर हे तिच्या आई-वडिलांवर फोडण्याची सवय असते. मात्र हे अत्यंत चुकीचं आहे. 

- अनामिका सिंग

 

लग्न करताना काही मुलींच्या अपेक्षा या उगाचच अवाजवी असतात. मुलगी स्वत: सुशिक्षित नसते पण नवरा मात्र खूप शिकलेला हवा. स्वत: ला चांगली नोकरी नसते पण मुलगा मात्र चांगल्या पदावर काम करणारा श्रीमंत हवा. तसेच तो सरकारी नोकर असावा किंवा मग गाडी, बंगलेवाला असावा या मुलींच्या अपेक्षा चुकीच्या आहेत. त्यांना सगळ्या सुखसोयी लग्नानंतर लगेच हव्या असतात पण सेटल होईपर्यंत वय 30 वर्षे होतं. 

- प्रशांत कवटे

 

टॅग्स :marriageलग्नPuneपुणे