शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
4
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
5
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
6
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
7
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
8
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
9
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
10
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
11
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
12
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
13
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
14
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
15
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
16
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
17
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
18
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
19
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
20
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटमधील आदिवासी गावांना टँकरचे पाणी पुरवा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 08:49 IST

विदभार्तील तापमान वाढत असून, मेळघाटसह धारणी, चिखलदरा, चुर्णी भागांतील अनेक गावे पाण्याअभावी त्रस्त आहेत.

मुंबई - विदभार्तील तापमान ४५-४६ अंश सेल्सिअसपर्यंत  पोहोचले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हा भाग अक्षरश: आगीने होरपळून निघेल, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला अमरावतीतील आदिवासी भाग असलेल्या मेळघाटमधील गावात किमान एक तरी पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्याचे निर्देश दिले.

सध्याच्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते. पाणीसाठा संपुष्टात आला आहे. कितीही खोलवर खणले तरी पाणी लागणार नाही,  पाणीपुरवठ्याविना या गावांतील लोक जगू शकणार नाहीत, असे न्या. रवींद्र घुगे व न्या. हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने म्हटले. बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांमधील कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंवर दाखल जनहित याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले. 

याचिकेत काय?

याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील  जुगल किशोर गिल्डा यांनी न्यायालयाला सांगितले, विदभार्तील तापमान वाढत असून, मेळघाटसह धारणी, चिखलदरा, चुर्णी भागांतील अनेक गावे पाण्याअभावी त्रस्त आहेत. पाण्याचे स्रोत आटणे व तीव्र बाष्पीभवन यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. न्यायालयाने अशा सर्व गावांची यादी तत्काळ देण्याचे निर्देश दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येक पावसाळा सुरू होईपर्यंत एक टँकर पिण्याचे पाणी पुरविण्याबाबत पुढील सुनावणीत अहवाल सादर करण्यास सांगितले.

पावसाळा येईपर्यंत विदर्भ होरपळून निघेल

सरकारी वकील सामंत यांनी न्यायालयाला सांगितले की, पुढील आदेशाची वाट न पाहता प्रशासन टँकर पुरवठ्याची व्यवस्था सुरू करेल आणि पुढील सुनावणीत स्थितीसंदर्भातील अहवाल सादर करू. मे महिन्याच्या मध्यापासून ते जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत विदर्भ अक्षरश: आगीने होरपळून निघेल आणि अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याशिवाय लोकांचे जगणे कठीण होईल, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पुढील सुनावणी ७ मे रोजी ठेवली.

English
हिंदी सारांश
Web Title : Provide water tankers to Melghat tribal villages: High Court directs state

Web Summary : Bombay High Court directs Maharashtra government to provide water tankers to tribal villages in Melghat due to severe heat and water scarcity. The court acted on petitions regarding malnutrition-related deaths, emphasizing the urgency for water supply before the monsoon. Next hearing on May 7.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयWater Scarcityपाणी टंचाई