शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

प्रसंगावधानी चालकाला ठरवले दोषी

By admin | Updated: December 18, 2014 05:26 IST

कल्याण-मलंगगड बसला लागलेल्या आगीच्या घटनेत चालकाला दोषी ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात सादर झालेल्या अहवालावर

कल्याण : कल्याण-मलंगगड बसला लागलेल्या आगीच्या घटनेत चालकाला दोषी ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात सादर झालेल्या अहवालावर मंगळवारच्या परिवहन समितीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रसंगावधान दाखविणाऱ्याला दोषी ठरविणारा अहवाल फेटाळण्यात यावा, अशी मागणी लावून धरल्याने सभापती रवींद्र कपोते यांनी सक्षम तज्ज्ञामार्फत पुन्हा चौकशी करून, नव्याने अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. ३ आॅक्टोबर २०१४ रोजी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली परिसरात कल्याण-मलंगगड या केडीएमटीच्या बसला आग लागली होती. या भीषण आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. चालक वीरेंद्र परदेशी आणि वाहक मनोहर मडके यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील १३ प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल मंगळवारच्या सभेत ठेवण्यात आला होता. त्यात अपघातास चालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला. टाटा कंपनीच्या बसेसला आगी लागल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. याला सर्वस्वी कार्यशाळा व्यवस्थापक जबाबदार असताना चालकाला दोषी का ठरविले, असा सवाल सभेत उपस्थित करण्यात आला. संबंधित टाटा कंपनीकडून देण्यात आलेल्या अहवालावरही सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. हा अहवाल कंपनीच्या सेल्स मॅनेजरने बनविल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. त्यांना अहवाल बनविण्याचा अधिकार आहे का. संबंधित अहवाल खोटा आहे. तो फेटाळण्यात यावा, अशी मागणी सदस्यांनी केली़ यावर अहवाल फेटाळताना संबंधित चालकाला तत्काळ सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश सभापती कपोते यांनी प्रशासनाला दिले. (प्रतिनिधी)