शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

“संजय राऊतांनी फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला असता तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 20:01 IST

संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आपल्या रोखठोक सदरातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देसंजय राऊत यांना भाजपकडून प्रत्युत्तरसंजय राऊत यांनी फुकटचा सल्ला मुख्यमंत्री ठाकरेंना द्यावा - दरेकरकाँग्रेसपेक्षा दीट पटींनी अर्थव्यवस्थेचा विकास - दरेकर

मुंबई: देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर आणि भीतीदायक होताना पाहायला मिळत आहे. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन कमतरतेमुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. तर, राज्यातील परिस्थितीवरून भाजप ठाकरे सरकारवर टीका करताना दिसत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावा, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे. (pravin darekar replied sanjay raut over rokthok statement about corona and economy)

संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याला भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींच पॅकेज जाहीर केले होते. संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावा. त्यामुळे महाराष्ट्राला गटांगळ्याच काय, त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यस्थेला नीट गती देता येईल, असा टोला दरेकर यांनी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला? भाजपचा सवाल

काँग्रेसपेक्षा दीट पटींनी आर्थिक विकास

अर्थव्यवस्थेच्या ज्ञानाची संजय राऊत यांनी उजळणी करण्याची आवश्यकता आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या १० वर्षांत जी प्रगती करू शकले नाहीत, ती प्रगती पंतप्रधान मोदींनी दीडपट गतीने गेल्या ५ वर्षांमध्ये केली. मोदींनी देश अर्थव्यवस्थेत प्रगतीकडे नेला. याचे भान संजय राऊत यांना नाही किंवा त्यांना ते समजून घ्यायचे नाही, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

 केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन: देवेंद्र फडणवीस

फुकटचा सल्ला मुख्यमंत्री ठाकरेंना द्यावा

संजय राऊत यांनी अर्थव्यवस्थेविषयीचे सल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत. कोरोनाच्या संकटात जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना पंतप्रधान मोदी यांनी देशाचा विकासदर फक्त वजा ८ टक्क्यांपर्यंत ठेवला. संजय राऊत केंद्रीय आणि देशपातळीवरचे नेते असल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयी त्यांना चिंता करावीशी वाटत नाही, असा दावाही दरेकर यांनी केला.

पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा

दरम्यान, कोरोना महामारीने देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. देशातील ६० टक्के कामगार बेकार झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांशने खाली आले आहे. आपले राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट आहेत, असे सांगतानाच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करून त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे आहे, अशी टीका संजय राऊत यांनी रोखठोकमधून केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसEconomyअर्थव्यवस्थाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाPoliticsराजकारण