शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंवरील हल्ल्यात पोलिसांचा दोष नाही - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: February 21, 2015 13:30 IST

गोविंद पानसरेंवरील हल्ला ही दुर्दैवी घटना असून या हल्ल्यासाठी पोलिसांना दोष देऊन चालणार नाही असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नाशिक, दि. २१ - गोविंद पानसरेंवरील हल्ला ही दुर्दैवी घटना असून या हल्ल्यासाठी पोलिसांना दोष देऊन चालणार नाही असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. पानसरेंवरील हल्ल्याने व्यवस्थेला आव्हान दिले असून हे आव्हान मोडून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. 
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर पाच दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे दिवसाढवळ्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करुन पळ काढला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गोविंद पानसरे यांना शुक्रवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र शुक्रवारी रात्री उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नरेंद्र दाभोलकर यांचे मारकेरी शोधण्यात महाराष्ट्र पोलिस अपयशी ठरत असतानाच पानसरे यांच्यासारख्या विचारवंताची हत्या झाली. यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांची पाठराखण केल्याचे दिसते. 
नाशिकमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी पानसरे यांच्यावरील हल्ल्यासाठी पोलिस जबाबदार नाही असे सांगितले. हा हल्ला व्यक्ती किंवा विचारांवरील हल्ला नसून हा हल्ला म्हणजे व्यवस्थेला दिलेले आव्हान आहे असे फडणवीस यांनी नमूद केले. पोलिसांनी ताकद लावल्यास लवकरच मारेकरी सापडतील असेही त्यांनी स्पष्ट केले.