शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

मनसे साफ फसली आहे, गर्तेत सापडली आहे; पीयुष गोयल यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 17:44 IST

मनसेबद्दल रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी एक विधान केलं आहे.

मुंबई- रेल्वे भरती परीक्षेतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आज मध्य रेल्वेवरील दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान 'रेल रोको' केलं होतं. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांना पाठिंबा देणाऱ्या मनसेबद्दल रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी एक विधान केलं आहे. रेल्वे परीक्षेसाठी दीड कोटी मुलांनी अप्लाय केलं, त्यामुळे मनसे पूर्णपणे फसलेली आहे, दरीत गेली आहे, असं रेल्वे मंत्री पीयुष गोयल म्हणाले. मंगळवारी शिवसेना खासदारांबरोबर झालेल्या बैठकित पियुष गोयल यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे पीयुष गोयल यांना नेमकं काय म्हणायचं? असा प्रश्न विचारला जातो आहे. शिवसेना खासदारांबरोबरच्या बैठकीत पीयुष गोयल बोलत होते. त्यावेळी तेथे काही पत्रकारही उपस्थित होते. पत्रकार समोर असल्याचं लक्षात आल्यावर पीयुष गोयल यांनी बोलणं सावरलं. या संदर्भातील एक व्हिडीओ समोर आला आहे.

खासदार आनंदराव अडसूळ, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, चंद्रकांत खैरे, श्रीकांत शिंदे  यांच्यासह अन्य सेना खासदारांच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली.यावेळी शिवसेना आणि पीयुष गोयल यांच्यात रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. अॅप्रेंटिस उमेदवारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी शिवसेना खासदारांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.

दरम्यान, रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांच्या या विधानावर मनसेनेही प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पियुष गोयल यांच्या पायाखालची जमीन खचली आहे. अशा विधानांना आम्ही किंमत देत नसून महाराष्ट्रात मराठी मुलांना प्राधान्य मिळायलाचं हवं, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. पियुष गोयल यांच्या या वक्तव्यावर मनसेकडून आणखी काही उत्तर मिळतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय आहे प्रकरण?

रेल्वे भरतीतील गोंधळामुळे अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी (20 मार्च) दादर-माटुंग्यादरम्यान रेल रोको केला . या रेल रोकोमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेवरील माटुंगा ते दादरदरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडल्यानं एकही लोकल पुढे सरकू शकत नाही. त्यामुळे लोकलसह एक्स्प्रेस गाड्याही खोळंबल्या आहेत. परंतु या अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांवर हे आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ ही रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच आली आहे. आधी रेल्वे अप्रेटिंसच्या विद्यार्थ्यांना थेट रेल्वेत सामावून घेतलं जात होतं, पण आता त्यासाठी रेल्वे प्रशासनानं 20 टक्क्यांच्या कोटा आरक्षित केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये सामावून घेण्यासाठी लेखी परीक्षाही अनिवार्य केली आहे. त्यामुळे बाहेरून येणा-या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य दिलं जात असल्याचा या अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रेल्वे प्रशासनानं मान्य न केल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला. विशेष म्हणजे यात अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलMNSमनसेcentral railwayमध्य रेल्वे