शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

शरद पवारांची 'ती' मागणी वाढवणार मुख्यमंत्री ठाकरेंच्या अडचणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 10:44 IST

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून एल्गार प्रकरणाच्या समांतर चौकशीचे संकेत

मुंबई: एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासावरुन महाविकास आघाडीत असलेले मतभेद वारंवार समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसआयटीच्या चौकशीची केलेली मागणी, मात्र तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एनआयएकडे तपास सोपवण्यास दिलेली मंजुरी यामुळे महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नसल्याचं दिसलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एल्गार प्रकरणाच्या समांतर चौकशीचे संकेत दिले आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एल्गार प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली आहे. मात्र हा तपास राज्य सरकारनं एसआयटीच्या माध्यमातून करावा, अशी आग्रही मागणी शरद पवारांनी आधीच केली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवल्यानं शरद पवारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. केंद्राचा निर्णय अयोग्य असून मुख्यमंत्र्यांनी त्याला दिलेली मंजुरी त्याहूनही अयोग्य असल्याचं पवार म्हणाले होते.यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा समांतर तपास केला जाऊ शकतो का, याबद्दल कायदेशीर सल्ला घेत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. गृह मंत्रालयाकडून या प्रकरणी एसआयटी स्थापन केली जाऊ शकते, याचे संकेत देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि ठाकरे आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्यअनिल देशमुख यांनी एल्गार प्रकरणाच्या चौकशीचे स्पष्ट संकेत दिले असताना आज सकाळी जळगावात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेची चौकशी ही दोन्ही प्रकरणं वेगळी असल्याचं पवार म्हणाले. सत्य दडपण्यासाठीच केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप केला आणि राज्याकडून तपास काढून घेतला, असं पवार यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी तपास एनआयएकडे सोपवला असताना राष्ट्रवादीकडून एसआयटीमार्फत चौकशीचे संकेत दिले जात असल्यानं महाविकास आघाडीतले मतभेद दिसून येत आहेत. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारAnil Deshmukhअनिल देशमुख