एरवी विरोधकांचा निषेध करण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरुन निदर्शने करताना दिसतात. मात्र भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चक्क एकमेकांच्या नेत्यांना पत्र पाठवून निषेध दर्शविणे सुरू झाले आहे. ...
जनता कर्फ्यूची घोषणा केल्यानंतरही शहरवासीयांवरील कठोर लॉकडाऊनचे संकट कायम आहे. महापौर संदीप जोशी यांनी बोलावलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनचा विरोध केला. सोबतच जनता कर्फ्यूनंतर ३१ तारखेला पुन्हा बैठक बोलावण्यात यावी, असा निर्णयही घेण्यात आला. ...
एकाच दिवसात कोरोनाचे २२२ नवे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंतची ही विक्रमी संख्या आहे. यापूर्वी सर्वाधिक, १८३ रुग्ण याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आढळून आले होते. विशेष म्हणजे, तीन दिवसात रुग्णसंख्येने ५००चा आकडा ओलांडला आहे. रुग्णसंख्या ३६८७ वर पोहच ...
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ लाख ८७ हजार ३०६ नमुन्यांपैकी ३ लाख ५७ हजार ११७ नमुने पॉझिटिव्ह (१९.९८ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ९७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. ...
घरगुती वाद आणि आर्थिक कोंडीला कंटाळून आपली बस चालकाने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
बहीण-भावातील अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण. हा सण सोमवार, ३ ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे इतवारी, महाल, सक्करदरा, सीताबर्डी बाजारासह शहराच्या विविध भागात राख्यांची दुकाने सजली आहे. ...
‘कोरोनाच्या काळातही आमचे नेते, पदाधिकारी जनतेच्या कल्याणासाठी बाहेर फिरतात, त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होते. तर भाजपचे नेते घरात बांगड्या भरून बसतात, त्यांना काही होत नाही,’ सभाध्यक्षांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी संताप व्यक्त करून सभेत चांगलाच ...