शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

वंचित-एमआयएमच ठरलं; 26 ऑगस्टला होणार जागावाटपाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 15:53 IST

वंचित आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा पहायला मिळत होती.

मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघ्या दोन महिन्यांचा काळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे एक-एक दिवस आमच्यासाठी महत्वाचा आहे. मात्र असे असतानाही वंचित बहुजन आघाडीकडून जागावाटप बाबत कोणताही खुलासा केला जात नसल्याने आमची चिंता वाढत असल्याचे एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील म्हणाले होते. मात्र यावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केला आहे. 26 ऑगस्टला मी हैदराबादला जाणार असून त्या दिवशी जागावाटपावर निर्णय घेतला जाणार असल्याचे आंबेडकर म्हणाले आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. मात्र एमआयएमला किती जागा सोडायच्या यावर अजूनही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे वंचित आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा पहायला मिळत होती. मात्र आता वंचित आणि एमआयएम यांच्यातील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार आहे. विशेष म्हणजे खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपाच्या निर्णयाची तारीख सुद्धा सांगितली आहे.

26 ऑगस्टला मी हैदराबादला जाणार असून त्या दिवशी जागावाटपावर निर्णय घेतला जाणार असल्याचे आंबेडकर म्हणाले आहे. त्याच बरोबर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले. त्याच बरोबर आम आदमी पक्षासोबतही बैठक होणार असून त्यांनाही वंचितमध्ये सामावून घेतलं जाणार असल्याची माहितीही प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

एकीकडे वंचित आणि एमआयएम यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटण्याचे चिन्ह आहेत. तर दुसरीकडे मात्र काँग्रेस आणि वंचित यांच्यातील जागावाटपाच पेच कायम आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी काँग्रेसला 144 जागांची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर काँग्रेस स्वीकारण्याची शक्यता नाही. त्यामुळे लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.