शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान सुज्ञ असावा हीच अपेक्षा होती...पंतप्रधान मोदींना राज ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 16:39 IST

मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या सभांनंतरही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरची तोफ धडधडणारी ठेवली आहे. निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी विकासावर बोलायचे सोडून देशभक्ती, राजीव गांधी अशा भलत्याच विषयांवर बोलत असल्याची टीका त्यांनी केली. देशाचा पंतप्रधान सुशिक्षित असण्याबरोबर सुज्ञही असायलाच हवा असे ठाकरे यांनी सांगितले.

मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळ, मराठा आरक्षण, नरेंद्र मोदींचे ढगाळ वातावरणाचे वक्तव्य आणि आंब्याच्या स्टॉलला तोडल्याविरोधात सडकून टीका केली. 

यंदाची निवडणूक विकासाच्या मुद्दयावर चाललेली नसल्याकडे लक्ष वेधताना ती 'देशभक्त विरुद्ध गालीभक्त' या मुद्द्यावर रंगविली जात आहे. या प्रश्नावर ठाकरे यांनी हे त्यांनी ठरवायचं नाही, नरेंद्र मोदी म्हणजे देश नव्हे. देशभक्तीची सर्टिफिकेट तुम्ही नाही वाटायची. नवाज शरीफला जाऊन केक भरवायचा होता तेव्हा देशभक्त आणि देशद्रोही ठरवायचं होतं, असा टोला राज यांनी हाणला. 

 

 

हिंदू दहशतवादाच्या प्रश्नावर त्यांनी हा जुना शब्द आहे. दहशतवादी हा दहशतवादीच, त्याचा धर्म नसतो. दहशतवादाला तिथल्या तिथे ठेचणं गरजेचं आहे. अमेरिकेनं ते केलं आणि नंतर इतक्या वर्षांत त्यांच्याकडे काहीही घडलेलं नसल्याचीही त्यांनी आठवण करून दिली. नरेंद्र मोदींनी जी स्वप्नं देशाला दाखवली होती, त्याच्यावर ते का बोलत नाहीत, याचं उत्तर मिळालं पाहिजे. या निवडणुकीचा राजीव गांधींशी काय संबंध, पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांचा काय संबंध असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

या सरकारकडून जातीय, धार्मिक ध्रुवीकरण केले जात आहे. लोक शहाणे आहेत. आपल्याला वाटत की त्यांना काही समजत नाही. पण त्यांना सगळं समजत असतं, असेही राज म्हणाले.  मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात जाणारच होता. आरक्षण मिळू शकत नव्हतं, यामुळे समाजाला सरकार फसवणारच होतं, एवढी वर्षे महाराष्ट्रातल्या-देशातल्या तरुणांशी खेळ करत बसलात का तुम्ही, असा सवाल विचारत त्यांनी विद्यार्थ्यांना भेटणार असल्याचे राज यांनी सांगितले. 

साध्वी प्रज्ञासिंहांवर वक्तव्यसाध्वी प्रज्ञासिंह या काय बोलतात त्याचे हे सरकार समर्थन करते आणि त्यांना तिकीट देते. लाजा वाटल्या पाहिजेत. अमित शहा यांनी पंतप्रधान किती शिकले याचे सर्टिफिकेट दाखविले होते. पण आम्ही कोणीच विचारले नव्हते. पंतप्रधान सुशिक्षित आहे का हे विचारलं नव्हतं तो सुज्ञ असावा ही अपेक्षा होती. राज्यकर्ते सुज्ञ असावेत हीच अपेक्षा असते असा टोलाही राज यांनी लगावला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMNSमनसेAmit Shahअमित शहाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक