शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांत धारच नाही

By admin | Updated: December 24, 2014 00:44 IST

उपराजधानीत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाला सपशेल अपयश आले असून, त्यांच्यात धारच नसल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या

नारायण राणे यांची स्वपक्षावरच टीका : चौकशी टाळण्यासाठी बचावात्मक पवित्रा घेतल्याचा आरोपनागपूर : उपराजधानीत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाला सपशेल अपयश आले असून, त्यांच्यात धारच नसल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:वरील चौकशी टाळण्यासाठी बचावात्मक पवित्रा घेतल्याचा टोलादेखील त्यांनी मारला. मंगळवारी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान राणे यांनी सर्वच पक्षांना ‘टार्गेट’ केले. यावेळी आमदार नीतेश राणेदेखील उपस्थित होते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उघडपणे वेगळ्या विदर्भाचे समर्थन करीत असताना विरोधक मात्र मूग गिळून शांत बसले आहेत. वस्तुत: विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेणे अपेक्षित असते. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश ठेवलेला नाही, या शब्दात राणे यांनी आपले परखड मत व्यक्त केले. या अधिवेशनात सरकारचादेखील कुठलाही प्रभाव नाही. जनतेला सरकारकडून कुठलाही दिलासा मिळालेला नाही. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस अतिशय कळकळीने विदर्भावर बोलायचे. परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी विदर्भासाठी काहीच दिले नाही. बोलणे सोपे असते, परंतु प्रत्यक्ष कृती कठीण असते, असा टोला राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. सरकारने जाहीर केलेले सात हजार कोटींचे पॅकेज फसवे असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेने तर सत्तेसाठी लाचारी पत्करली असून, या पक्षाचे अस्तित्व आणि ध्येयधोरणे धुळीला मिळाली आहेत. एकूणच हे सरकार केवळ आश्वासने देणारे ‘ज्योतिषी’ व ‘लेटलतीफ’ सरकार असल्याचेदेखील ते म्हणाले.(प्रतिनिधी)खडसेंनी अर्थसंकल्प पाहिला का?अगोदरच्या आघाडी सरकारने राज्याची तिजोरी रिकामी केल्याचा आरोप खडसे यांनी केला. परंतु त्यांनी अर्थसंकल्प पाहिला आहे का, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र नव्हे तर गुजरात दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे खडसेंच्या दाव्यात काहीच तथ्य नाही, असे ते म्हणाले.मुंबईला राज्यापासून तोडण्याचा डावमुंबईच्या विकासासाठी वेगळी समिती स्थापन करून त्याचे अध्यक्षपद पंतप्रधानांकडे देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातमधील सूरत, अहमदाबादच्या विकासासाठी पंतप्रधानांची समिती नेमण्यात आली नव्हती. मुंबईचे महत्त्व कमी करून राज्यापासून तोडण्याचा हा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. विदर्भाचा विकास करीत असताना जर कोकणच्या निधीला कात्री लावण्याचा प्रयत्न केला तर जोरदार आंदोलन करू, असा इशारादेखील त्यांनी दिला.