शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

ऊस उत्पादकाशी करार असेल तरच 'एफआरपी' चे तुकडे पाडता येणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:30 AM

सलग दुसऱ्या हंगामात राज्यात विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. साखरेला उठाव नसल्याने अनेक कारखान्यांना एफआरपीची रक्कम देता आली नव्हती. ..

ठळक मुद्देप्रत्येक सभासदाशी करार आवश्यक : सर्वसाधारण सभेतील कराराचा ठराव अमान्य होणारगेल्या हंगामातील १४५ लाख टन साखर शिल्लकशेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक

पुणे : अगामी साखर हंगामामधे ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर दरासाठी (एफआरपी) बहुतांश साखर कारखाने कारार पद्धतीचा अवलंब करण्याची दाट शक्यता आहे. मात्र, त्यासाठी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठराव पुरेसा ठरणार नाही. ऊस घालणाºया प्रत्येक सभासदासोबत स्वतंत्र करार करणे कारखान्यांना बंधनकारक असल्याचे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले. सलग दुसऱ्या हंगामात राज्यात विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. साखरेला उठाव नसल्याने अनेक कारखान्यांना एफआरपीची रक्कम देता आली नव्हती. त्यामुळे विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन केले होते. त्यामुळे केंद्रसरकारला साखरेचा हमीभाव २९०० रुपये प्रति क्विंटलवरुन ३१०० रुपये करावा लागला. शुगरकेन कंट्रोल कायदयानुसार १९६६ नुसार शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित शेतकऱ्यास व्याजासह एफआरपी द्यावी लागते. आगामी गाळप हंगामात देशात २६३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज असून, गेल्या हंगामातील १४५ लाख टन साखर शिल्लकी आहे. देशांतर्गत साखरेचा खप हा २६० लाख टन इतका आहे. त्यामुळे यंदा देखील साखरेला फारसा भाव मिळणार नसल्याची स्थिती आहे. एफआरपीवरुन झालेल्या आंदोलनानंतर शुगरकेन कंट्रोल कायद्यातील मधील तरतूद, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी प्रकाशात आणली. त्या नुसार एखाद्या कारखान्याने प्रत्येक सभासदाशी एफआरपी बाबत करार केल्यास त्यांना एफआरपीची संपूर्ण रक्कम एकाच वेळी देण्याचे बंधन नाही. त्यामुळे गेल्यावर्षी साखर हंगाम तीस टक्के उरकल्यानंतर काही कारखान्यांनी असे करार करण्यास सुरुवात केली. काहींनी सर्वसाधारण सभेत ठराव केल्याचे सांगितले. गेल्यावर्षी प्रथमच १९५ सहकारी आणि खासगी कारखान्यांपैकी सुमारे ६० कारखान्यांनी करार केले होते. त्यात एफआरपीच्या ७५ टक्के १४ दिवसांत आणि उर्वरीत रक्कम बैलपोळा आणि दिवाळीला समान हप्त्यात देण्याचे करार काहींनी केले. यंदा या संख्येत आणखी वाढ होऊ शकते. ------------------------

शुगरकेन कंट्रोल कायद्यानुसार कारखान्याने प्रत्येक सभासदाशी एफआरपीबाबत करार न केल्यास त्यांना १४ दिवसांत ऊस बिल देणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक सभासदाशी करार आवश्यक आहे. सर्वसाधारण सभेत केलेला कराराचा ठराव ग्राह्य धरला जाणार नाही. शेखर गायकवाड, साखर आयुक्त  

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार