शहरं
Join us  
Trending Stories
1
"इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर..."; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
2
Mumbai Airport: मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल, 'या' विमानांत स्फोटकं, दर अर्ध्या तासाला उडवून देणार!
3
हनुमानगढमध्ये मोठा हिंसाचार! इथेनॉल फॅक्टरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक; १६ वाहनांना आग, काँग्रेसचे आमदार जखमी
4
दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर ED, ATS ची छापेमारी
5
Sovereign Gold Bond: ₹२,९५४ च्या गुंतवणूकीवर ₹१२,८०१ चा रिटर्न; गुंतवणूकदारांना कुठे मिळतोय ४ पट पैसा, जाणून घ्या
6
‘क्रिकेटएवढं मला काहीही प्रिय नाही’; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी
7
टॅरिफ वॉरचे नवे संकट! आधी अमेरिका, आता मेक्सिकोचा ५०% टॅरिफ हल्ला; भारत-चीनसह अनेक देशांना मोठा झटका
8
६ वर्षांतील सर्वात मोठे मतभेद! फेडरल रिझर्व्हमध्येच धोरणांवर एकमत नाही; व्याजदरात कपात केली पण...
9
सार्वजनिक हिताचा विचार करूनच होर्डिंग्जचे निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचा जाहिरातदारांना परवाना शुल्कात दिलासा देण्यास नकार
10
मोठी बातमी! थायलंड पोलिसांनी लूथरा बंधूंना फुकेतमध्ये पकडले; भारतात आणले जाणार...
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, IT आणि मेटल शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
'डॉ. शिरीष वळसंगकर यांना आयुष्य संपवण्यापूर्वी 'पी राऊत' नावाच्या महिलेचे दहा कॉल', कोर्टात काय घडलं?
13
मोठी बातमी! गोवा आग दुर्घटनेनंतर देश सोडून पळणाऱ्या लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित
14
US Seizes Oil Tanker: हेलिकॉप्टरमधून उतरले आणि तेलाचे जहाज केले जप्त, व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई
15
Smriti Mandhana: लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची एका कार्यक्रमात हजेरी, सर्वांसमोर मनातलं बोलून दाखवलं!
16
क्लब जळत होता, लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते अन् लुथरा बंधु थायलंडचं तिकीट बुक करत होते! 
17
अनिल अंबानी समूहाच्या कंपनीवर ईडीची मोठी कारवाई, १३ बँक खाती गोठवली; कोणते आहेत आरोप?
18
Your Money, Your Right: पीएम मोदींच्या आवाहनानं उघडू शकतं तुमचं नशीब; काय आहे हे आणि कसा होऊ शकतो फायदा?
19
लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येचा उलगडा; तिने इंजिनियर जोडीदाराला का संपवलं? म्हणाली, "तो माझ्या मुलींना.."
20
महायुतीचा फॉर्म्युला ठरला! मुंबईत शिंदेसेनेला 'इतक्या' जागा हव्यात, पुण्यात BJP-NCP वेगळं लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या एकतृतीयांश पीकक्षेत्राचा उतरविला विमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 10:45 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधे अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी राज्य सरकारने विम्याची मुदत २४ जुलैवरून ३१ जुलैपर्यंत वाढविली होती.

ठळक मुद्दे१ कोटीहून अधिक अर्ज : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा ७२ टक्के वाटामराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा घेणे केले पसंत

पुणे : पीक विमा रकमेच्या परताव्यावरून उडालेले राजकीय रणकंदन, मराठवाडा व विदर्भातील पावसाचा घसरलेला टक्का, निसर्गाचे बदलत असलेले चक्र या पार्श्वभूमीवर यंदा पीक विम्यासाठी तब्बल १ कोटी ७ लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील तब्बल ७२ टक्के अर्ज मराठवाड्यातील आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी खरिपाच्या एकतृतीयांश क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण घेतले आहे. मराठवाडा गेली काही वर्षे सातत्याने दुष्काळाला सामोरा जात आहे. पावसाळ््याचे दोन महिने संपले तरी मराठवाड्यात क्षमतेच्या अवघा तीन टक्के पाणीसाठा धरणात आहे. नागपूर विभागातही केवळ २४ व अमरावती विभागात ३४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे साहजिकच मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधे अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी राज्य सरकारने विम्याची मुदत २४ जुलैवरून ३१ जुलैपर्यंत वाढविली होती. पीक विमा योजनेसाठी विमा कंपन्यांना द्याव्या लागणाऱ्यां शुल्कातील काही वाटा शेतकरी, तर उर्वरित भाग केंद्र व राज्य सरकार उचलते. जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा घेणे पसंत केले आहे. खरिपाचे सरासरी क्षेत्र दीड कोटी हेक्टर आहे. त्यापैकी तब्बल ५३ लाख ७८ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरविला आहे. गत खरीप हंगामात (२०१८) राज्यातील ८५ लाख ६ हजार ८२८ शेतकऱ्यांनी ४९ लाख २० हजार ३९१ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला होता. यंदा शेतकऱ्यांची संख्या १ कोटी सात लाख ६२ हजार ३२५ झाली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या तब्बल ७८ लाख ४८ हजार २८८ इतकी आहे. खालोखाल पुणे विभागातील ११ लाख २७ हजार ४३५ व अमरावती विभागातील १० लाख ५४ हजार ८०९ शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. .१८ हजार कोटींचे विमा संरक्षण मिळणार

शेतकऱ्यांनी ५३ लाख ७८ हजार ६८१ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला असून, त्यापोटी शेतकऱ्यांनी ४५० कोटी ५ लाख ६३ हजार ४३३ रुपये भरले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने विमा हप्त्यापोटी प्रत्येकी १५९९ कोटी रुपये अनुदान म्हणून दिले आहे. यातून तब्बल १८ हजार १०३ कोटी २६ लाख ७९ हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. ..........विभागनिहाय सहभागी शेतकरी     (पीक क्षेत्र हेक्टरमध्ये/रक्कम रुपयांत)विभाग    सहभागी        शेतकऱ्यांनी                क्षेत्र           शेतकरी        भरलेली रक्कम    कोकण    ३५,८०९      १,७३,३२,२०५          २१५१४.०१नाशिक    ३,२२,५३९      २९,५३,३४,७९२    २५०१४४.८३पुणे            ११,२७,४३५      ४१,६७,९१,१००    ७५१३४१.८४कोल्हापूर    ९९,८५३      २,७९,६६,३१७    ५६०२१.०६औरंगाबाद    ४१,८२,७५७       १४३,०३,१८,६६१    १५५८४२१.१३लातूर    ३६,६५,५३१      १४३,७८,०७,२७३    १८०५२५७.४१अमरावती    १०,५४,८०९    ६६,२६,०६,८२१    ७६२८२५.१९नागपूर    २,७३,५९२    १६,२४,०६,२६१    १७३१५५.९३एकूण    १,०७,६२,३२५    ४४५,०५,६३,४३३    ५३,७८,६८१.४०........ 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारagricultureशेतीRainपाऊसdroughtदुष्काळ