शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

खरिपाच्या एकतृतीयांश पीकक्षेत्राचा उतरविला विमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 10:45 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधे अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी राज्य सरकारने विम्याची मुदत २४ जुलैवरून ३१ जुलैपर्यंत वाढविली होती.

ठळक मुद्दे१ कोटीहून अधिक अर्ज : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा ७२ टक्के वाटामराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा घेणे केले पसंत

पुणे : पीक विमा रकमेच्या परताव्यावरून उडालेले राजकीय रणकंदन, मराठवाडा व विदर्भातील पावसाचा घसरलेला टक्का, निसर्गाचे बदलत असलेले चक्र या पार्श्वभूमीवर यंदा पीक विम्यासाठी तब्बल १ कोटी ७ लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील तब्बल ७२ टक्के अर्ज मराठवाड्यातील आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी खरिपाच्या एकतृतीयांश क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण घेतले आहे. मराठवाडा गेली काही वर्षे सातत्याने दुष्काळाला सामोरा जात आहे. पावसाळ््याचे दोन महिने संपले तरी मराठवाड्यात क्षमतेच्या अवघा तीन टक्के पाणीसाठा धरणात आहे. नागपूर विभागातही केवळ २४ व अमरावती विभागात ३४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे साहजिकच मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधे अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी राज्य सरकारने विम्याची मुदत २४ जुलैवरून ३१ जुलैपर्यंत वाढविली होती. पीक विमा योजनेसाठी विमा कंपन्यांना द्याव्या लागणाऱ्यां शुल्कातील काही वाटा शेतकरी, तर उर्वरित भाग केंद्र व राज्य सरकार उचलते. जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा घेणे पसंत केले आहे. खरिपाचे सरासरी क्षेत्र दीड कोटी हेक्टर आहे. त्यापैकी तब्बल ५३ लाख ७८ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरविला आहे. गत खरीप हंगामात (२०१८) राज्यातील ८५ लाख ६ हजार ८२८ शेतकऱ्यांनी ४९ लाख २० हजार ३९१ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला होता. यंदा शेतकऱ्यांची संख्या १ कोटी सात लाख ६२ हजार ३२५ झाली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या तब्बल ७८ लाख ४८ हजार २८८ इतकी आहे. खालोखाल पुणे विभागातील ११ लाख २७ हजार ४३५ व अमरावती विभागातील १० लाख ५४ हजार ८०९ शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. .१८ हजार कोटींचे विमा संरक्षण मिळणार

शेतकऱ्यांनी ५३ लाख ७८ हजार ६८१ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला असून, त्यापोटी शेतकऱ्यांनी ४५० कोटी ५ लाख ६३ हजार ४३३ रुपये भरले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने विमा हप्त्यापोटी प्रत्येकी १५९९ कोटी रुपये अनुदान म्हणून दिले आहे. यातून तब्बल १८ हजार १०३ कोटी २६ लाख ७९ हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. ..........विभागनिहाय सहभागी शेतकरी     (पीक क्षेत्र हेक्टरमध्ये/रक्कम रुपयांत)विभाग    सहभागी        शेतकऱ्यांनी                क्षेत्र           शेतकरी        भरलेली रक्कम    कोकण    ३५,८०९      १,७३,३२,२०५          २१५१४.०१नाशिक    ३,२२,५३९      २९,५३,३४,७९२    २५०१४४.८३पुणे            ११,२७,४३५      ४१,६७,९१,१००    ७५१३४१.८४कोल्हापूर    ९९,८५३      २,७९,६६,३१७    ५६०२१.०६औरंगाबाद    ४१,८२,७५७       १४३,०३,१८,६६१    १५५८४२१.१३लातूर    ३६,६५,५३१      १४३,७८,०७,२७३    १८०५२५७.४१अमरावती    १०,५४,८०९    ६६,२६,०६,८२१    ७६२८२५.१९नागपूर    २,७३,५९२    १६,२४,०६,२६१    १७३१५५.९३एकूण    १,०७,६२,३२५    ४४५,०५,६३,४३३    ५३,७८,६८१.४०........ 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारagricultureशेतीRainपाऊसdroughtदुष्काळ