शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या एकतृतीयांश पीकक्षेत्राचा उतरविला विमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 10:45 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधे अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी राज्य सरकारने विम्याची मुदत २४ जुलैवरून ३१ जुलैपर्यंत वाढविली होती.

ठळक मुद्दे१ कोटीहून अधिक अर्ज : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा ७२ टक्के वाटामराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा घेणे केले पसंत

पुणे : पीक विमा रकमेच्या परताव्यावरून उडालेले राजकीय रणकंदन, मराठवाडा व विदर्भातील पावसाचा घसरलेला टक्का, निसर्गाचे बदलत असलेले चक्र या पार्श्वभूमीवर यंदा पीक विम्यासाठी तब्बल १ कोटी ७ लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील तब्बल ७२ टक्के अर्ज मराठवाड्यातील आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी खरिपाच्या एकतृतीयांश क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण घेतले आहे. मराठवाडा गेली काही वर्षे सातत्याने दुष्काळाला सामोरा जात आहे. पावसाळ््याचे दोन महिने संपले तरी मराठवाड्यात क्षमतेच्या अवघा तीन टक्के पाणीसाठा धरणात आहे. नागपूर विभागातही केवळ २४ व अमरावती विभागात ३४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे साहजिकच मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधे अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी राज्य सरकारने विम्याची मुदत २४ जुलैवरून ३१ जुलैपर्यंत वाढविली होती. पीक विमा योजनेसाठी विमा कंपन्यांना द्याव्या लागणाऱ्यां शुल्कातील काही वाटा शेतकरी, तर उर्वरित भाग केंद्र व राज्य सरकार उचलते. जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा घेणे पसंत केले आहे. खरिपाचे सरासरी क्षेत्र दीड कोटी हेक्टर आहे. त्यापैकी तब्बल ५३ लाख ७८ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरविला आहे. गत खरीप हंगामात (२०१८) राज्यातील ८५ लाख ६ हजार ८२८ शेतकऱ्यांनी ४९ लाख २० हजार ३९१ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला होता. यंदा शेतकऱ्यांची संख्या १ कोटी सात लाख ६२ हजार ३२५ झाली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या तब्बल ७८ लाख ४८ हजार २८८ इतकी आहे. खालोखाल पुणे विभागातील ११ लाख २७ हजार ४३५ व अमरावती विभागातील १० लाख ५४ हजार ८०९ शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. .१८ हजार कोटींचे विमा संरक्षण मिळणार

शेतकऱ्यांनी ५३ लाख ७८ हजार ६८१ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला असून, त्यापोटी शेतकऱ्यांनी ४५० कोटी ५ लाख ६३ हजार ४३३ रुपये भरले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने विमा हप्त्यापोटी प्रत्येकी १५९९ कोटी रुपये अनुदान म्हणून दिले आहे. यातून तब्बल १८ हजार १०३ कोटी २६ लाख ७९ हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. ..........विभागनिहाय सहभागी शेतकरी     (पीक क्षेत्र हेक्टरमध्ये/रक्कम रुपयांत)विभाग    सहभागी        शेतकऱ्यांनी                क्षेत्र           शेतकरी        भरलेली रक्कम    कोकण    ३५,८०९      १,७३,३२,२०५          २१५१४.०१नाशिक    ३,२२,५३९      २९,५३,३४,७९२    २५०१४४.८३पुणे            ११,२७,४३५      ४१,६७,९१,१००    ७५१३४१.८४कोल्हापूर    ९९,८५३      २,७९,६६,३१७    ५६०२१.०६औरंगाबाद    ४१,८२,७५७       १४३,०३,१८,६६१    १५५८४२१.१३लातूर    ३६,६५,५३१      १४३,७८,०७,२७३    १८०५२५७.४१अमरावती    १०,५४,८०९    ६६,२६,०६,८२१    ७६२८२५.१९नागपूर    २,७३,५९२    १६,२४,०६,२६१    १७३१५५.९३एकूण    १,०७,६२,३२५    ४४५,०५,६३,४३३    ५३,७८,६८१.४०........ 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारagricultureशेतीRainपाऊसdroughtदुष्काळ