शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

एक रुपया पर्यावरणासाठी !

By admin | Updated: March 11, 2015 03:39 IST

निसर्ग, पर्यावरण, जलस्त्रोत, वने आणि शेती या मुलभूत स्त्रोतांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात आजवरच्या इतिहासातील सर्वात कमी तरतू

पुणे : निसर्ग, पर्यावरण, जलस्त्रोत, वने आणि शेती या मुलभूत स्त्रोतांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात आजवरच्या इतिहासातील सर्वात कमी तरतूद केल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. त्याविरोधात ‘जीविधा’ संस्थेने पंतप्रधानांना निषेध पत्र पाठविण्याबरोबरच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला १ रूपया पाठविला जाणार आहे. नरेंद्र मोदी सरकारने पर्यावरणीय मंजुऱ्या धाब्यावर बसवून विनाशकारी २४० उद्योग प्रकल्पांना मान्यता दिल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यावरणासाठीच्या तरतूदीमध्ये कपातच होत असल्याचे आढळून आले आहे. एकूण अंदाजपत्रकीय रकमेच्या ०़०१ टक्क्यांहूनही कमी निधीची तरतूद पर्यावरणासाठी करण्यात येत आहे. भारताच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ ०़०१२ टक्के इतकाच त्याचा हिस्सा आहे. वन्यजीवन, जलस्त्रोत, वने यांच्या संवर्धन आणि रक्षणासाठी निधी उपलब्ध न करता, चुकीच्या आणि दिखाऊ गोष्टींना अंदाजपत्रकात अग्रक्रम देण्यात आला आहे. त्यातच केंद्र सरकारने भारताचे पाच अत्यंत मुलभूत पर्यावरणरक्षक कायदे बदलून घेण्यासाठी सुब्रमण्यम समिती नेमून तिच्या विघातक शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत. त्याविरुद्धचा आवाज पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे सकारात्मक निषेध आंदोलन सुरू केल्याची माहिती ‘जीविधा’चे संस्थापक अध्यक्ष राजीव पंडित यांनी दिली.ते म्हणाले, पी. चिदम्बरम यांनी २०१३-१४ च्या अंदाजपत्रकात निसर्ग-पर्यावरणासाठी २,४३० कोटींची तरतूद केली होती. त्यात अरुण जेटली यांनी २०१४-१५च्या अंतरिम लेखानुदानातील तरतुदीमध्ये अधिकच कपात करत ती १,७८१़६० कोटी इतकी केली. यंदाच्या अर्थसंकल्पात ती १,६८१़६० कोटीपर्यंत आणली. गतवर्षीपेक्षा त्यात १५ टक्के कपात झाल्याचे माहिती अधिकारातून पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाच्या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)