शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

मंगळवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल ५ तास वाहतुकीसाठी राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 1:27 PM

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवार १९ सप्टेंबर रोजी तपासणीसाठी सकाळी ५ तास बंद ठेवला जाणार आहे.

ठळक मुद्दे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवार १९ सप्टेंबर रोजी तपासणीसाठी सकाळी ५ तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नविन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहनप्रवास टाळावा असे आवाहन केलं आहे.

- धीरज परबमीरारोड/ठाणे, दि. 16- मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवार १९ सप्टेंबर रोजी तपासणीसाठी सकाळी ५ तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नविन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहनप्रवास टाळावा असे आवाहन महामार्ग प्राधिकरण व वाहतुक पोलिसांनी केले आहे. मुंबईला जोडणारा वसई खाडीवरील जुना वरसावे पूल हा गेल्या वर्षी सप्टेंबरपासून गर्डरला तडा गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कुठल्या पध्दतीने त्याची दुरुस्ती करायची यावर मोठा काथ्याकुट झाल्यावर अखेर उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेम (ट्रस ) चा आधार देऊन दुरुस्ती करण्यात आली. पूल बंद असल्याचा काळात नविन पुलावरुनच दोन्ही बाजुची वाहतुक सुरु होती. परंतु या मुळे काही तास वाहतुक कोंडीत लोकांना घालवावे लागत होते. ९ महिन्यांपासून बंद असलेला हा पूल अखेर मे मध्ये सुरु करण्यात आला.

सध्या जुना पुलावरुन एका मार्गिकेतुन लहान तर एका मार्गिकेतुन मोठी वाहनं सोडली जात आहेत. तसे असले तरी पुलाची नियमीत तपासणी करणे गरजेचे बनले आहे. कारण महाड पूल दुर्घटने नंतर शासकीय यंत्रणा कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही. शिवाय जुन्या पुलावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. नियमीत तपासणी मध्ये पुलाची वजन झेलण्याची क्षमता, तडा गेलेल्या गर्डरची स्थिती दुरुस्ती केलेल्या ट्रसची तपासणी केली जाणार असल्याचे प्राधिकरणाच्या सुत्रांनी सांगीतले. अशा प्रकारची तपासणी ही दर तीन ते चार महिन्यांनी केली जाणार आहे.

मंगळवारीदेखील सकाळी ८ वाजल्यापासून तपासणीसाठी जुना पूल वाहतुकीकरीता बंद ठेवला जाणार आहे. सदर तपासणीचे काम सुमारे ५ तास चालणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरुन वसई - गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतुक नविन पुलावरुन वळवली जाणार आहे. जेणे करुन वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने पोलिस व वाहतुक पोलिसांसह प्राधिकरणदेखील तयारीला लागले आहे.वाहतुकीच्या नियोजनासाठी मीरा भार्इंदर वाहतुक शाखेचे १८ ; पालघर शाखेचे २२ तर महामार्ग वाहतुक शाखेचे ११ असे मिळुन ५१ अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहे. शिवाय पालिकेच्य वतीने ट्रॅफिक वॉर्डन सुध्दा दिले जाणार आहेत. 

अवजड व मोठी वाहनं भिवंडी - चिंचोटी मार्गे वळविण्याचे सांगण्यात आले आहे. दर वीस मिनीटांनी नविन पुलावरुन एका एका बाजुची वाहनं सोडली जाणार आहेत.जगदिश शिंदे, निरीक्षक, वाहतूक पोलीस