शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण; राज्यपालांची स्वाक्षरी; अध्यादेशाची औपचारिकता बाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 8:03 AM

अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गाला लोकसंख्येच्या अनुपातात दिलेले आरक्षण वगळून ५० टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग या अध्यादेशांमुळे  प्रशस्त झाला.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) राजकीय आरक्षण देण्यासंदर्भातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी सही केली. त्यावर आता शासनाने अध्यादेश काढताच ओबीसींचे आरक्षण पुन्हा बहाल होणार आहे.  

अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गाला लोकसंख्येच्या अनुपातात दिलेले आरक्षण वगळून ५० टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग या अध्यादेशांमुळे  प्रशस्त झाला. आता अध्यादेशाची औपचारिकता बाकी आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमधील ओबीसी आरक्षणासाठी हा अध्यादेश लागू राहील. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अध्यादेशाचा मसुदा राज्यपालांकडे पाठविण्यात आला होता. बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याने शुक्रवारी ओबीसींना आरक्षण पुन्हा बहाल करण्याचा अध्यादेश जारी करण्यात येईल. 

महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतींमधील ओबीसी आरक्षणाचा मसुदा राज्यपालांकडे लवकरच पाठविला जाणार आहे. पूर्वी ओबीसींना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरसकट २७ टक्के आरक्षण होते. मात्र, ४ मार्च २०२१ रोजीच्या आदेशाने ते संपुष्टात आले. ओबीसींचे राजकीय मागासलेपण सिद्ध करणारा इम्पिरिकल डाटा तयार करा आणि त्या आधारे ५० टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींना आरक्षण द्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता. इम्पिरिकल डाटा तयार होण्यास काही अवधी लागणार असल्याने महाविकास आघाडी सरकारने अध्यादेशाची मात्रा काढली. अध्यादेशाचा मसुदा राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठविला असता, त्यांनी काही मुद्द्यांवर सरकारला लेखी विचारणा केली होती. त्याची पूर्तता काल शासनाने केल्यानंतर राज्यपालांनी अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. ओबीसींना पुन्हा आरक्षण देण्याचा शब्द आमचे सरकार पूर्ण करीत आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

अध्यादेशानंतर ओबीसींना पूर्वीप्रमाणे सरसकट २७ टक्के आरक्षण मिळणार नाही. एससी, एसटी आरक्षण वगळून ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण त्यांना मिळेल. 

शासन करणार आयोगाला विनंतीनव्या अध्यादेशानुसारच राज्यात कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक व्हावी, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यांमधील पोटनिवडणूक स्थगित करून ओबीसींना आरक्षण पुन्हा बहाल करीत ही निवडणूक घ्यावी, अशी विनंती राज्य शासनाच्या वतीने आयोगाला केली जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. मात्र, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही पोटनिवडणूक घेत आहोत, त्यामुळे ती थांबविता येणार नाही, अशी भूमिका आयोगाने घेतली तर सर्वोच्च न्यायालयात लगेच दाद मागण्याचा एक पर्याय राज्य सरकारपुढे असेल.

अध्यादेश मिळाल्यावर ठरवू : यू. पी. एस. मदान नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यांमधील जि. प. व पं. स. पूर्वीच्या ओबीसी राखीव जागांवर खुल्या प्रवर्गातून ५ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अध्यादेश आमच्यापर्यंत आलेला नाही. तो मिळाल्यानंतर निर्णय घेऊ.  

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीPoliticsराजकारण