शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

३१ कारखान्यांकडील अडीचशे कोटींच्या एफआरपीची फुटेना कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 1:57 PM

थकीत एफआरपीमुळे यंदाचा हंगाम जास्त चर्चेत राहिला.

ठळक मुद्दे३१ कारखाने : काही थकबाकीदारांकडे यंदाही थकबाकीसहा मे अखेरीस राज्यातील ६८ कारखान्यांवर आरआरसी कारवाई गाळप हंगाम संपूनही ३ हजार ६०७ कोटी ५२ लाख रुपयांची कारखान्यांकडे थकबाकी साखर आयुक्तालयाकडून रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) काढण्याचा धडाका सुरु

पुणे : साखर कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरापोटी (एफआरपी) रक्कम थकविल्या प्रकरणी साखर आयुक्तालयाकडून रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) काढण्याचा धडाका सुरु आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत ३१ कारखान्यांकडे तब्बल अडीचशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील काही कारखाने यंदाही थकबाकीदार आहेत. थकबाकीची ही कोंडी साखर आयुक्तालय कधी फोडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. थकीत एफआरपीमुळे यंदाचा हंगाम जास्त चर्चेत राहिला. शेतकरी संघटनांनी केलेले आंदोलन, साखर कारखान्यांकडून एफआरपी देण्यात होत असलेला विलंब यामुळे सहा मे अखेरीस राज्यातील ६८ कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यात आली आहे. यंदा एप्रिल अखेरीस राज्यातील कारखान्यांकडे २२ हजार ४२ कोटी रुपयांचे देणे होते. त्यापैकी १८ हजार ८२१ कोटी २२ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. गाळप हंगाम संपूनही ३ हजार ६०७ कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे आहे. यंदा गाळप हंगाम घेतलेल्या १९५ पैकी अवघ्या ४३ कारखान्यांनीच शंभर टक्के एफआरपी दिली आहे. शुगरकेन कंट्रोलन कायद्यानुसार शेतकºयांची एफआरपीबाबत वैयक्तीक करार झालेला नसल्यास, त्यांना १४ दिवसांत एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे. राज्यातील ३१ साखर कारखान्यांकडे २०११-१२ पासून ते २०१७-१८ या हंगामातील तब्बल २४९ कोटी ५२ लाख रुपयांची एफआरपी थकीत आहेत. त्यात बीडचा जय भवानी साखर कारखाना, साताºयाचा रयत साखर कारखाना यांच्याकडे या वर्षासह पुर्वीची देखील थकबाकी दिसून येते. रयतकडे २०१४-१५मध्ये ९ कोटी ८१ लाख आणि बीडच्या जयभवानीकडे ३ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी दिसत आहे. यंदा देखील दोन्ही कारखान्यांकडे थकबाकी असून, त्यातील जयभवानी कारखान्यावर या वर्षी आरआरसी कारवाई देखील करण्यात आली आहे. -----------------२०११-१२ ते १७-१८ या गाळप हंगामातील प्रमुख थकबाकीदार (रक्कम कोटीत)

दौलत-कोल्हापूर                              १९.९६    वसंतदादा शेतकरी-सांगली                ५५.४रयत-सातारा                                   ९.८१न्यू फलटण                                     ४८.४१स्वामी समर्थ-सोलापूर                     ९.०७श्री शंकर-सोलापूर                            ३०.७६आर्यन शुगर-सोलापूर                      २१.०५विजय शुगर-सोलापूर                     २०.१७शंभू महादेव-उस्मानाबाद               ११.८७चोपडा-जळगाव                             १२.८२समर्थ-जालना                               ३.६५जयभवानी-बीड                             ३.२६एच. जे. पाटील-नांदेड                    ५.५७महाराष्ट्र शेतकरी-परभणी             ९.९२         

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार