शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यासमोर नवं संकट! १० लाखांहून अधिक नैसर्गिक प्रजाती नष्ट, मानवी आरोग्यालाही मोठा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 14:25 IST

Raigad Climate Action Plan: गेल्या ५० वर्षात महाराष्ट्रात पूर, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांची तीव्रता चक्क ४ पटीने वाढली आहे. हे केवळ निसर्गाचे बदल नसून मानवासाठी धोक्याची घंटा आहे. हे संकट रोखण्यासाठी रायगड जिल्हा आता स्वतःचा 'क्लायमेट ॲक्शन प्लॅन' तयार करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात गेल्या ५० वर्षात उष्णतेचे दिवस, दुष्काळाची तीव्रता आणि पूरस्थिती चौपट पटीने वाढली आहे. कोकण विभागामध्ये (रायगडसह) पूर, समुद्र पातळीतील वाढ, मॅन्ग्रोव्ह आणि जैवविविधतेचा -हास, आरोग्य धोके (जसे लेप्टोस्पायरोसिस) वाढत आहेत. त्यामुळे निसर्गचक्र बिघडले असून, हे वातावरणीय बदलाचे परिणाम आहेत, असे महाराष्ट्राच्या वातावरणीय कृती कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे यांनी स्पष्ट केले.

निर्धारित वातावरणीय बदलाचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम रायगड जिल्हा 'क्लायमेट अॅक्शन प्लॅन' तयार करणार असल्याची घोषणा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो, असर सोशल इम्पॅक्ट अॅडवायसर व वातावरण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'नॅशनल सेमिनार ऑन लोकलायझिंग जेंडर क्लायमेट अॅक्शन' कार्यक्रमात अभिजीत घोरपडे आणि किशन जावळे बोलत होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या प्रकल्प संचालक प्रा. मंजुळा भारती म्हणाल्या, प्रवाहाबाहेर ढकलल्या गेलेल्या लोकसमुदायांना केंद्रस्थानी आणून आम्ही वातावरण बदलाच्या शासन व्यवस्थेची नव्याने मांडणी करत आहोत.

काय आहे अॅक्शन प्लॅन?

क्लायमेट अॅक्शन प्लॅन म्हणजे हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तयार केलेली एक सुनियोजित कृती योजना आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने मुंबईसह अनेक शहरांमध्ये (नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर) यासाठी आराखडे तयार केले आहेत.

१० लाखांहून अधिक नैसर्गिक प्रजाती नष्ट

वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभट म्हणाले, सध्या जगभरात १० लाखांहून अधिक नैसर्गिक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. येत्या काही वर्षात उरलीसुरली जैवविविधता वाचवणे गरजेचे आहे. जगभरात वाढत्या तापमान वाढीच्या संकटाबद्दल उपाययोजना करणे गरजेचे आहे. याकरिता वातावरणीय बदलाचे कृतिशील सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे म्हणाल्या, आदिवासी संस्कृती ही पर्यावरण केंद्रित आहे आणि आदिवासी समुदायाचे बळकटीकरण करणे आणि त्यांना शाश्वत निसर्गकेंद्री रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या क्लायमेट अॅक्शन प्लॅनचे थोरण असेल. तसेच सामूहिक वन व्यवस्थापन या कृतीचा प्रभावी उपयोग या वातावरणीय कृती आराखड्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या कृती आराखड्यामुळे वातावरणीय बदलाचे परिणाम समजण्यास सोपे जाईल आणि त्यानुसार उपाय करता येतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Faces New Crisis: Extinction Threatens Species, Human Health at Risk!

Web Summary : Maharashtra confronts rising heat, droughts, and floods. Over one million species face extinction, endangering human health. Raigad pioneers a 'Climate Action Plan' to combat climate change and reduce emissions, focusing on vulnerable communities and sustainable solutions.
टॅग्स :weatherहवामान अंदाजMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगड