शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा, काँग्रेसमध्ये सामसूम

By अतुल कुलकर्णी | Updated: January 18, 2018 04:33 IST

राज्यभर हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे सगळे प्रमुख नेते एकत्रितपणे सरकारविरोधी वातावरण तयार करत फिरत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र सामसूम आहे

मुंबई : राज्यभर हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे सगळे प्रमुख नेते एकत्रितपणे सरकारविरोधी वातावरण तयार करत फिरत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र सामसूम आहे. ज्येष्ठ नेत्यांमधे एकवाक्यता होत नाही. राज्याचे नेतृत्व कोणी करायचे याविषयी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात चुरस लागल्याने पक्षातल्या अन्य नेत्यांमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे.

राष्ट्रवादीने मात्र सगळ्या पातळ्यांवर सरकारच्या विरोधाची धार वाढवणे सुरू केले आहे. एकीकडे अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जयंत पाटील आणि त्यांच्या बरोबरीने खा. सुप्रिया सुळे हे ज्येष्ठ नेते राज्यभर फिरत आहेत. विदर्भात त्यांनी काढलेली हल्लाबोल यात्रा यशस्वी झाली. त्याचा शेवट पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी केला गेला. मराठवाड्यात सुरू असलेल्या यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत संविधान बचाव आंदोलनात राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. यासाठी शरद पवार यांनी पडद्यामागून सूत्रे हलवली असून फारुक अब्दुल्ला, शरद यादव, सीताराम येचुरी यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गजांना त्यांनी आमंत्रित केले आहे.

या आंदोलनात काँग्रेसचे नेते सहभागी व्हावेत अशी आमची इच्छा असल्याचे राष्ट्रवादीचे नेते बोलत असताना काँग्रेसने स्वतंत्र प्रेसनोट काढून काँग्रेसचे सगळे नेते यात सहभागी होतील असे दोन दिवसांनी जाहीर केले. आमच्या वरिष्ठ नेत्यांचे आपापसांतील वादच संपत नाहीत. राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात, संघटनेच्या कामात मी कसा हस्तक्षेप करणार? अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना विखेंचे विधिमंडळातील काम पटत नाही. विदर्भातील नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ काँग्रेसचे पिल्लू सोडून दिले आहे. पक्षातर्फे मोठे राज्यव्यापी आंदोलन कोणी घेत नाही, अशा स्थितीत आम्ही करायचे तरी काय, असा सवाल काँग्रेसचे अनेक आमदार करत आहेत.भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत झाली. त्यात आता लोकसभेसाठी सज्ज व्हा असे सांगण्यात आले. तेव्हा आम्हाला कोणतेही पद दिले नाही, मान दिला नाही; आणि आता निवडणुका जवळ आल्या की आम्हालाच कामाला लागा म्हणता, आम्ही कोणत्या तोंडाने लोकांसमोर जायचे, असे प्रश्न अनेक पदाधिकाºयांनी विचारल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस