“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:13 IST2025-09-25T18:12:12+5:302025-09-25T18:13:15+5:30

NCP SP Group Jayant Patil: शेतकरी संकटात आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि न्याय द्यावा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

ncp sp jayant patil said simply compensation is the right way and direct assistance of 50 thousand per acre should be provided immediately | “सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील

“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील

NCP SP Group Jayant Patil: शेतकऱ्यांच्या शिवारात उभे असलेले सोनेरी पीक काही क्षणांत नष्ट झाले. शेतकरी डोळ्यांत अश्रू घेऊन आपला संसार उद्ध्वस्त होताना बघत आहे. शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकवून अधिक मानसिक छळ देण्यापेक्षा सरसकट नुकसानभरपाई देणे हाच योग्य मार्ग आहे. त्यामुळे एकरी किमान ₹५०,००० इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली. 

जयंत पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आ. अभिजीत पाटील, आ. नारायण पाटील, जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख, युवती जिल्हाध्यक्ष विनंती कुलकर्णी आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा

जयंत पाटील पुढे म्हणाले की, माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता, त्यातच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आज शेतकरी संकटात आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी सरकारकडून व्यक्त केली.

 

Web Title : सपाट मुआवजा ही सही रास्ता; ₹50,000 सहायता तुरंत चाहिए: जयंत पाटिल

Web Summary : जयंत पाटिल ने सोलापुर में बारिश से प्रभावित किसानों के लिए तत्काल ₹50,000 प्रति एकड़ मुआवजे की मांग की। उन्होंने नौकरशाही देरी की आलोचना की और सरकार से तुरंत कार्रवाई करने का आग्रह किया, हाल ही में भारी बारिश के कारण किसानों की परेशानी और ऋण बोझ पर प्रकाश डाला, तत्काल राहत की आवश्यकता पर जोर दिया।

Web Title : Flat compensation is the right way; ₹50,000 aid needed now.

Web Summary : Jayant Patil demands immediate ₹50,000 per acre compensation for rain-affected farmers in Solapur. He criticized bureaucratic delays and urged the government to act swiftly, highlighting the farmers' distress and debt burden due to recent heavy rainfall, emphasizing the need for immediate relief.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.