शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

..अन्यथा फडणवीस साहेब वेडेवाकडे जन्माला आले असते: रुपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 5:33 PM

मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेचे काळे झेंडे दाखवून स्वागत होत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली असून आज ही यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आघाडी सरकारने काय केले म्हणणाऱ्या फडणवीस यांना आमच्या सरकारने पोलियो डोस पाजले नसते तर ते वेडेवाकडे जन्माला आले असते. असा खोचक टोला चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.

चाकणकर पुढे म्हणाल्यात की, मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेचे काळे झेंडे दाखवून स्वागत होत आहे. फडणवीस सरकारच पाच वर्षात पापाचा घडा एवढा भरला आहे,की त्यांना जनते समोर जाताना भीती वाटत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने गेल्या ७० वर्षात काय केलं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जर आघाडीच्या सरकारने पोलिओचा डोस दिला नसता, तर ते वेडेवाकडे जन्माला आले असते. अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली.

राज्यात महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राज्यातील सर्वात अपयशी गृहमंत्री म्हणून फडणवीस ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. लोकांमध्ये जायला मुख्यमंत्र्यांना भीती वाटते. त्यामुळे ते आपल्या यात्रा पोलीस बंदोबस्तात काढत असल्याचा आरोप सुद्धा चाकणकर यांनी यावेळी केला.