भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का; रोहित पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 03:23 PM2021-03-27T15:23:18+5:302021-03-27T15:26:59+5:30

रोहित पवार (rohit pawar) यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना टोला लगावला आहे.

ncp leader rohit pawar criticised bjp over phone tapping issue | भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का; रोहित पवारांचा सवाल

भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का; रोहित पवारांचा सवाल

Next
ठळक मुद्देरोहित पवार यांची भाजपवर टीकाफोन टॅपिंग प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरूचरोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनेकविध प्रकरणांवरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपसह अन्य पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राजकीय वातावरण ढवळून निघताना पाहायला मिळत आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंग प्रकरणातील अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. मात्र, हा अहवाल कुंटे यांनी तयार केलाच नसावा, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी म्हटले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी अप्रत्यक्षरित्या फडणवीस यांना टोला लगावला आहे. (ncp leader rohit pawar criticised bjp over phone tapping issue)

रोहित पवार यांनी एकामागून एक अशी दोन ट्विट करत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करून त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचे काही 'अनुभवी' नेत्याचं म्हणणे आहे. म्हणून भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का,असा प्रश्न मला पडला. पण हे सरकार व मुख्य सचिव असं करणार नाही याची खात्री आहे”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. 

सरकारला बदनाम करण्यासाठीच 'फोन टॅपिंग'चं षडयंत्र

मुख्य सचिवांच्या अहवालातील अनेक बाबी धक्कादायक आहेत. मविआ सरकारला बदनाम करण्यासाठीच 'फोन टॅपिंग'चं षडयंत्र रचण्यात आलं काय, अशी शंका या अहवालावरून येतेय. तसंच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय गोळ्या झाडण्याची अशी प्रथा पडली तर भविष्यात प्रशासनाला काम करणंही अवघड होईल, असे रोहित पवार यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’

दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जो अहवाल दिला, तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो, ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Web Title: ncp leader rohit pawar criticised bjp over phone tapping issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.