शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट अशक्य, जनता महाविकास आघाडीच्या कामावर समाधानी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 13:38 IST

maha vikas aghadi : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची एकही संधी विरोधक सोडत दिसत नाहीत. ठाकरे सरकारवर टीका करताना राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणार असल्याचा सूर विरोधकांकडून आळवण्यात आला.

ठळक मुद्देनारायण राणे यांच्यावर टीकास्त्रमनसुख हिरेन प्रकरणी सत्य लवकरच समोर येईल - राष्ट्रवादीराज्यात अशीच कुणालाही राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही - नवाब मलिक

मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची एकही संधी विरोधक सोडत दिसत नाहीत. ठाकरे सरकारवर टीका करताना राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणार असल्याचा सूर विरोधकांकडून आळवण्यात आला. मात्र, महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या कामावर समाधानी आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावणे अशक्य आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (ncp leader nawab malik criticized bjp leader narayan rane)

भाजप खासदार नारायण राणे यांनी सुरुवातीला सरकार टिकणार नाही, फाटाफूट होऊन भाजपची सत्ता येईल, असा दावा केला होता. मात्र, या गोष्टीला आता १५ महिने उलटून गेल्यानंतर हा बाजा वाजवणे बंद केले. आता ते पुन्हा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहेत. कारण, भाजपकडे दुसरा पर्याय नाही, पण हे अशक्य आहे. कोणत्याही राज्यात अशीच कुणालाही राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही, असे नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना सांगितले.

RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली कोरोना लस

सत्य लवकरच समोर येईल

डेलकर यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये बऱ्याच लोकांची नावे आहेत. पोलीस तपास करत आहेत. यामध्ये भाजप नेत्यांचाही समावेश आहे. हा तपास रोखण्यासाठी दबाव आणला जाऊ नये. यंत्रणांना त्यांचे काम करू दिले पाहिजे.  मनसुख हिरेन प्रकरणातही सत्य लवकरच समोर येईल. तोपर्यंत कोण काय म्हणतंय, यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे. 

दरम्यान, मनसुख हिरेन यांचा मृत्यू जसा संशयास्पद आहे, तशीच या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकारची भूमिकाही संशयास्पद वाटते. मराठा आरक्षणाचा घोळ राज्य सरकारच्या अनास्थेमुळे झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. वीज बिलांमुळे सामान्य वीजग्राहक हैराण झाला आहे. आता या मुद्यांवर जनजागृती करण्यासाठी भाजपच्या २० हजार शक्तिकेंद्रांतर्फे २० हजार सभा, बैठका घेण्यात येतील, असे चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाPresident Ruleराष्ट्रपती राजवटNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसnawab malikनवाब मलिकNarayan Raneनारायण राणे BJPभाजपा