शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, ‘तोपर्यंत’ धोका नाही; राष्ट्रवादी नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 14:15 IST

भाजपकडून केले जात असणारे दावे फेटाळत महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्याने केला आहे.

ठळक मुद्देभाजपच्या ऑपरेशन लोटसची पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चातोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला धोका नाहीमहाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल - मुश्रीफ

मुंबई: पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये समाधान आवताडे यांचा विजय झाल्यानंतर राज्यात आता भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर राज्यात सुरू असताना राजकारण तापतानाही दिसत आहे. मात्र, भाजपकडून केले जात असणारे दावे फेटाळत महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्याने केला आहे. (ncp hasan mushrif claims that maha vikas aghadi govt continue next 25 years)

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, तुम्ही पंढरपूरमध्ये भाजपला साथ द्या…मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो, असे वक्तव्य केले होते. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या त्या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. 

“गैरमार्गाने केलेल्या कामाचा हेतू कधी शुद्ध राहत नाही”; न्यायालयाने सुजय विखेंना सुनावले

तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला धोका नाही

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचे हे सरकार पुढील २५ वर्ष चालेल, असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. 

लसींवरून राजकारण! मोदी सरकार की अदार पुनावाला, नेमकं खरं कोण?

‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेला जोर 

भाजपने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना धोबीपछाड देत पंढपूरची निवडणूक जिंकली. त्यामुळे भाजप राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात भाष्य करणे टाळले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस सांगत असतील, तोपर्यंत त्यामध्ये तथ्य असेलच, असे सूचक वक्तव्य यावेळी केले होते. 

निकालानंतर बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांत झटापट, ९ जणांचा मृत्यू

दरम्यान, पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव हा लोकांच्या नाराजीमुळे झालेला नाही. रणनीती आखण्यात महाविकास आघाडी कमी पडली. भगीरथ भालके यांच्याऐवजी त्यांच्या आईला उमेदवारी दिली असती, तर काम सोपे झाले असते. मात्र, आम्ही हा निकाल स्वीकारला आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Hasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021Politicsराजकारण