शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

Maharashtra Political Crisis: अजित पवार-जयंत पाटलांमध्ये खडाजंगी? शरद पवारांनी केली मध्यस्थी! पण झालं तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 17:16 IST

Maharashtra Political Crisis: एकीकडे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: आताच्या घडीला देशात आणि राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या अभूतपूर्व ऐतिहासिक बंडानंतर राज्यातील राजकीय संघर्ष शिगेला गेला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत नवे सरकार स्थापन केले आणि यानंतर आता महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे सांगितले जात आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून जयंत पाटील (Jayant Patil) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात वाद झाल्याने अखेर शरद पवार (Sharad Pawar) यांना मध्यस्थी करून नाराजी दूर करावी लागली, अशी माहिती मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीवेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या वाद झाल्याचे सांगितले जात आहे. अखेर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मध्यस्थी केली आणि जयंत पाटील यांची समजूत काढत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक 

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्याचे आगामी पावसाळी अधिवेशन, या अधिवेशनात विरोधी पक्षांची रणनीति काय असायला हवी तसेच राज्यातील कोणत्या मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरता येऊ शकेल, याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजित पवार यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेता केल्यामुळे जयंत पाटील हे नाराज होते, अशी चर्चा आधीपासूनच राजकीय वर्तुळात होती. यावर बोलताना आपण नाराज नसल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला होता. मात्र, या बैठकीत शरद पवार यांनी या वादात मध्यस्थी करत जयंत पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करून दोन्ही नेत्यांना एकमेकांसोबत चांगले काम करण्याचे आवाहन केले आहे. 

दरम्यान, या बैठकीत शरद पवार यांनी दोन्ही नेत्यांशी चर्चा केली. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला होता. अजित पवार यांना विरोधी पक्षनेता म्हणून ३० ते ३५ आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे अजित पवार यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली. तत्पूर्वी जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नियुक्तीचे पत्र विधानसभा अध्यक्षांना वेळेत दिले नव्हते. प्रफुल्ल पटेल यांनी दोनवेळा फोन करून पाठपुरावा केल्यावर ते देण्यात आले. त्यामुळे जयंत पाटील यांची या निवडीवर नाराजी होती, असा मोठा दावा करण्यात येत असून, या नाराजी नाट्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस