शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

Maharashtra Political Crisis: अजित पवार-जयंत पाटलांमध्ये खडाजंगी? शरद पवारांनी केली मध्यस्थी! पण झालं तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 17:16 IST

Maharashtra Political Crisis: एकीकडे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: आताच्या घडीला देशात आणि राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या अभूतपूर्व ऐतिहासिक बंडानंतर राज्यातील राजकीय संघर्ष शिगेला गेला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत नवे सरकार स्थापन केले आणि यानंतर आता महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे सांगितले जात आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून जयंत पाटील (Jayant Patil) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात वाद झाल्याने अखेर शरद पवार (Sharad Pawar) यांना मध्यस्थी करून नाराजी दूर करावी लागली, अशी माहिती मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीवेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या वाद झाल्याचे सांगितले जात आहे. अखेर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मध्यस्थी केली आणि जयंत पाटील यांची समजूत काढत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक 

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्याचे आगामी पावसाळी अधिवेशन, या अधिवेशनात विरोधी पक्षांची रणनीति काय असायला हवी तसेच राज्यातील कोणत्या मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरता येऊ शकेल, याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजित पवार यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेता केल्यामुळे जयंत पाटील हे नाराज होते, अशी चर्चा आधीपासूनच राजकीय वर्तुळात होती. यावर बोलताना आपण नाराज नसल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला होता. मात्र, या बैठकीत शरद पवार यांनी या वादात मध्यस्थी करत जयंत पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करून दोन्ही नेत्यांना एकमेकांसोबत चांगले काम करण्याचे आवाहन केले आहे. 

दरम्यान, या बैठकीत शरद पवार यांनी दोन्ही नेत्यांशी चर्चा केली. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला होता. अजित पवार यांना विरोधी पक्षनेता म्हणून ३० ते ३५ आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे अजित पवार यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली. तत्पूर्वी जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नियुक्तीचे पत्र विधानसभा अध्यक्षांना वेळेत दिले नव्हते. प्रफुल्ल पटेल यांनी दोनवेळा फोन करून पाठपुरावा केल्यावर ते देण्यात आले. त्यामुळे जयंत पाटील यांची या निवडीवर नाराजी होती, असा मोठा दावा करण्यात येत असून, या नाराजी नाट्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस