शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

Sharad Pawar : आता विषय निघालाच आहे तर...; मावळवरून शरद पवारांचं फडणवीसांना ९० हजारी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 18:03 IST

मावळची तुलता लखीमपूर हिंसाचाराशी करणाऱ्या Devendra Fadnavis फडणवीसांना Sharad Pawar शरद पवारांचं उत्तर

मुंबई: लखीमपूरमधील हिंसाचारावरून देशातील वातावरण तापलं आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारनं चिरडल्याचा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलावर आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं आहे. लखीमपूरमधील हिंसाचाराची तुलना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी Sharad Pawar जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी पवारांना काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना घडलेल्या मावळ गोळीबाराची आठवण करून दिली. यानंतर आता पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

देवेंद्र फडणवीसांनी लखीमपूरवर बोलताना मावळचं प्रकरण काढलं. त्यांनी तो विषय काढला हे बरंच झालं, असं शरद पवार म्हणाले. 'मावळमध्ये तेव्हा नेमकं काय घडलं, ते अनेकांच्या त्यावेळी लक्षात आलं नाही. त्या कारवाईत शेतकरी मृत्यूमुखी पडले ही गोष्ट खरी आहे. मात्र त्याला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते, मंत्री जबाबदार नव्हते. ती कारवाई पोलिसांची होती. आता मावळचं चित्र स्पष्ट झालं आहे. तिथली परिस्थिती हाताबाहेर जावी यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी प्रोत्साहित केलं, असा दावा पवारांनी केला. मावळमधलं सत्य समोर आल्यानंतर लोकांचा गैरसमज दूर झाला. त्यानंतर तिथली परिस्थिती बदलली. काही अपवाद वगळता मावळ विधानसभा मतदारसंघात कायम जनसंघ आणि भाजपचं वर्चस्व राहिलं. रामभाऊ म्हाळगी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व विधानसभेत केलं. मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांबद्दल तिथे संताप निर्माण झाला. पण माथी भडकावण्याचं काम कोणी केलं हे लोकांच्या लक्षात आल्यावर चित्र बदललं. २०१९ मध्ये तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार तब्बल ९० हजार मतांनी निवडून आला, असं पवार यांनी सांगितलं. फडणवीसांचं कौतुक अन् अभिनंदनगेल्या दोन वर्षांत लोकांचं खूप प्रेम मिळालं. त्यामुळे मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच म्हटलं. फडणवीसांच्या या विधानावरून शरद पवारांनी पत्रकार परिषदेत टोलेबाजी केली. विरोधी पक्षनेत्यांना ते आजही मुख्यमंत्री आहेत असं वाटतात. त्यांचं कौतुक वाटतं. त्यांचं मी अभिनंदन करतो, असा चिमटा शरद पवारांनी काढला.

फडणवीसांना अद्यापही ते मुख्यमंत्री आहेत असं वाटतं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. याबाबतीत मी थोडा कमी पडतो. चारवेळा मुख्यमंत्री राहूनही मला फडणवीसांसारखं वाटत नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे अशी भावना माझ्या मनात निर्माण होत नाही. फडणवीसांना ते मुख्यमंत्री आहेत असं वाटतं. मी पुन्हा येईनची त्यांची जखम किती सखोल आहे हे त्यातून दिसतं, असा टोला पवारांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार