शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

“पुढे काय परिस्थिती असेल, आता सांगता येत नाही, आढावा घेऊन निर्णय घेणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 14:53 IST

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

ठळक मुद्देनवाब मलिक यांची कोरोना परिस्थितीवर प्रतिक्रियाएकंदर स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार - मलिकपुढे काय होईल, हे आताच सांगता येणार नाही - मलिक

मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यभरात कोरोनाचा उद्रेक होत असून, आता कठोर लॉकडाऊन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बेड, ऑक्सिजन, औषधांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. एकंदर सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय घेण्यात येईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (nawab malik react on corona situation lockdown in the state)

नवाब मलिक प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील करोना परिस्थिती आणि राज्य सरकारकडून टाकल्या जाणाऱ्या पावलांची माहिती दिली. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचा संक्रमण वेग प्रचंड असल्याने अवघ्या महिनाभरातच आरोग्य व्यवस्थेवर ताण येण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्य सरकार लॉकडाऊनच्या तयारीत आहे, असे सांगितले जात आहे. 

आढावा घेऊन निर्णय घेणार

पुढे काय परिस्थिती निर्माण होईल, हे आताच सांगता येणार नाही, पण महाराष्ट्रातील आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा, बेड्सची व्यवस्था आयसीयू बेड्स यांची व्यवस्था करण्यासंदर्भातील अधिकार सर्वच जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आलेले आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. 

तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी; जयंत पाटलांना सदाभाऊंचा टोला

मुंबईत कोविड सेंटरची क्षमता दहा हजार रुग्णांपर्यंत

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणखी क्षमता वाढवण्याचे काम राज्यात सुरू आहे. मुंबईत कोव्हिड सेंटरची क्षमता दहा हजार रुग्णांपर्यंत पोहोचली आहे. त्यात आता दोन नवीन जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रत्येक वॉर्डात नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे. तसेच कोव्हिड सेंटरमध्येही नोडल अधिकारी असणार आहे. आताच्या घडीला नियम तयार करण्यात आलेले आहेत, ते लागू आहेत. सरकार व सरकारमधील सर्व मंत्री एकत्रितपणे परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतील, असे नवाब मलिक म्हणाले. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन करावा, असे मत तज्ज्ञांनी या बैठकीत व्यक्त केले.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसState Governmentराज्य सरकार