शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
2
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालच्या निकटवर्तीयाची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
3
“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा
4
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
5
Success Story: ६ वर्ष पत्नीच्या पगारातून चालवलं घर, छोट्या खोलीतून सुरू केला बिझनेस; आज २.९ अब्ज डॉलर्सची आहे नेटवर्थ
6
तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना
7
पोर्शे कार अपघात : पोलिसांनी बाळाच्या बापाला सोबत घेऊन घेतली घराची झडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून
8
Anil Ambani News : दिवाळखोर अनिल अंबानी १५ दिवसांत कुठून देणार ₹२५९९ कोटी, कोणती नोटीस देतेय टेन्शन?
9
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
10
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
11
धनदेवता कुबेराचे ‘हे’ एक स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; अपार धनलाभ, लक्ष्मीची विशेष कृपा!
12
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
13
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
14
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
15
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
16
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
17
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
18
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
19
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
20
"...हे बेजबाबदारपणाचे लक्षण"; आयोग सत्ताधारी पक्षाकडे झुकणे म्हणजे लोकशाही धोक्यात; काँग्रेसची टीका

शिवसैनिकांना अंधारात ठेवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले: नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 3:11 PM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे यांच्याऐवजी त्यांनी शिवसैनिकालाच मुख्यमंत्री बनविले असते, असेही राणे म्हणाले.

मुंबई : उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची शपथविधी झाल्यापसून भाजपचे नेते नारायण राणेंचा टीकेचा बाण अधिकीच टोकदार झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरेंवर टीका करण्याची कोणतेही संधी ते सोडत नाही. मंगळवारी कुडाळ तालुक्यात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना आमदार व शिवसैनिकांना अंधारात ठेवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

स्वार्थापोटी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एका रात्रीत सर्व अधिकार देऊन शिवसेनेचे आमदार व शिवसैनिकांना अंधारात ठेवून स्वत: मुख्यमंत्री बनले असल्याचा गौप्यस्फोट कुडाळ येथील पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी केला. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे यांच्याऐवजी त्यांनी शिवसैनिकालाच मुख्यमंत्री बनविले असते, असेही राणे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे हे शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करणार असल्याचे बोलत होते.निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांना तसेच सांगत त्यांना व्यस्त ठेवले. यावेळी मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे माजी मंत्री सुभाष देसाई,एकनाथ शिंदे व खासदार संजय राऊत यांची नावे पुढे येत होती. मात्र, अशा वेळी महाविकास आघाडीच्या शेवटच्या झालेल्या बैठकीनंतर एका रात्रीत उद्धव ठाकरे, संजय राऊत,आमदार आदित्य ठाकरे हे शरद पवार यांच्या घरी गेले व यावेळी उद्धव ठाकरे यांनी पवार यांना आपण स्वता: मुख्यमंत्री होण्यास इच्छुक असून तुम्हीच नाव जाहीर करा, अशी विनंती केली.

त्यांनतर दुसऱ्याच दिवशी पवार यांनी स्वता: उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी होणार असल्याचे घोषित केलं.असे करताना ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना अंधारात ठेवले तसेच सर्व अधिकार पवार यांना दिल्यामुळे आता त्यांना पवार यांचेच ऐकावे लागणार आहे.बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी जसे त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री न बनविता आम्हा शिवसैनिकांना मुख्यमंत्री केले, तसेच यावेळी ही त्यांनी शिवसैनिकालाच मुख्यमंत्री केले असते,असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.