शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

Nana Patole: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमदारांच्या पत्राला उत्तर द्यावीत; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 10:51 AM

Nana Patole interview to Lokmat: देवेंद्र फडणवीस उत्तम प्रशासक आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहमंत्री पदही सांभाळले होते

ठळक मुद्देखातं कसं वापराचं आणि प्रशासन कसं चालवायचं त्यात देवेंद्र फडणवीस एक्सपर्ट अशोक चव्हाण यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांच्यात राजकीय परिपक्वता आहे. परंतु संकुचित भावना त्यांनी सोडली पाहिजेबाळासाहेब थोरात सरळ व्यक्तीमत्व आहे. कुणाचं मन माझ्यामुळे दुखू नये अशी त्यांची भूमिका

मुंबई – मुख्यमंत्री कुठल्याही पत्राला उत्तरं देत नाहीत अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) वारंवार करत असतात. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. लोकमतच्या फेस टू फेस या मुलाखतीत पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना त्यांचा दोष सांगत त्यांना एक सल्लाही दिला आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) म्हणाले की, कोविडसारख्या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगले काम केले. धार्मिक स्थळं बंद होती म्हणून अनेक टीका त्यांच्यावर झाली. परंतु लोकांचा जीव वाचवणं यासाठी मुख्यमंत्र्यांनी जी कठोर भूमिका घेतली त्यांच कौतुक आहे. परंतु आमदारांच्या पत्रांना उत्तरं दिली जात नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या पत्रावर उत्तर द्यावं असा सल्ला नाना पटोले यांनी दिला.

काँग्रेस आमदारांना निधी मिळावा यासाठी झगडावं

बाळासाहेब थोरात सरळ व्यक्तीमत्व आहे. कुणाचं मन माझ्यामुळे दुखू नये अशी त्यांची भूमिका आहे. जी राजकीय व्यवस्था राज्यात आहे. या तीन पक्षाच्या सरकारमध्ये बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला जातो असा आरोप आहे. काँग्रेस आमदारांना निधीचं वाटप कमी होते. काँग्रेसच्या हिस्स्यात जे काही आहे ते मिळाले पाहिजे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसच्या आमदाराला जास्त निधी मिळेल यासाठी भांडावं असा सल्ला प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिला आहे. तर अशोक चव्हाण यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांच्यात राजकीय परिपक्वता आहे. परंतु संकुचित भावना त्यांनी सोडली पाहिजे असा खोचक सल्ला त्यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस उत्तम प्रशासक

देवेंद्र फडणवीस उत्तम प्रशासक आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहमंत्री पदही सांभाळले होते. विधिमंडळ अधिवेशनात नेहमी कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे खातं सांभाळायला कसरत करावी लागते. त्यामुळे गृह खातं दुसऱ्याला द्यावं असा सल्ला मी मित्र म्हणून दिला होता. पण या खात्याचे महत्त्व तुला आता कळणार नाही, या खात्याचा वापर कसा करेन हे भविष्यात कळेल असं फडणवीसांनी सांगितले होते. ते खातं कसं वापराचं आणि प्रशासन कसं चालवायचं त्यात ते एक्सपर्ट आहेत. परंतु काही घरं सोडायची असतात असा सल्ला मित्र म्हणून त्यांना देतो.

वडिलांची ‘ती’ अखेरची इच्छा पूर्ण करु शकलो नाही; नाना पटोलेंना गहिवरुन आले

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे