शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरी संत्रा रस्त्यावर

By admin | Updated: November 17, 2014 01:05 IST

देशातील इतर भागांच्या तुलनेत नागपूरची संत्री गोड आणि दर्जेदार असून, जगभरात लोकप्रिय आहेत. संत्रा हे विदर्भातील प्रमुख फळपीक असताना त्याच्या विपणन व ब्रँडिंगकडे शासाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे.

उत्पादन जास्त पण भाव नाही : ब्रँडिंगकडे शासनाचे दुर्लक्षनागपूर : देशातील इतर भागांच्या तुलनेत नागपूरची संत्री गोड आणि दर्जेदार असून, जगभरात लोकप्रिय आहेत. संत्रा हे विदर्भातील प्रमुख फळपीक असताना त्याच्या विपणन व ब्रँडिंगकडे शासाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्याचा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यंदा संत्र्याचा आंबिया बार मोठ्या प्रमाणात आल्याने व बाजारपेठेत हवी ती किंमत न मिळाल्याने नागपुरातील रस्त्यांवर बसून संत्र्यांची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काटोल परिसरातील शेतकरी संतोष आंबिलवादे हे आज टाटा एस गाडीने कळमना येथे यंत्रा विकायला घेऊन गेले. पण रविवारमुळे मार्केट बंद होते. व्यापारी संत्रा घेतील, अशी त्यांना अपेक्षा होती. एका व्यापाऱ्याने माल घेण्याची तयारीही दाखविली. पण भाव खूप पडका दिला. त्यामुळे संतोष हे तेथून संत्रा परत घेऊन निघाले. गर्दीच्या सक्करदरा चौकाच्या बाजूला त्यांनी रस्त्याच्या बाजूला गाडी उभी केली व रस्त्यावरच संत्रा विक्रीस सुरुवात केली. सध्या असेच काहीसे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसोबत घडत आहे. नागपूर शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला संत्र्याचे ढीग विक्रीसाठी लागलेले पहायला मिळत आहे. शेतकरी ३० ते ६० रुपये झडन या भावाने ग्राहक मिळेल तशी संत्र्याची विक्री करीत आहेत. दिवसभरात संत्रा विकला गेला नाही तर काही शेतकरी रात्र फुटपाथवर काढून दुसऱ्या दिवशी उरलेली संत्री विकत आहेत, तर काही शेतकरी उरलेली संत्री घेऊन गावी परतत आहेत. संत्र्याचे उत्पादन राजस्थान आणि पंजाब राज्यात होत असले तरीही आंबट-गोड चव आणि सुगंधामुळे नागपुरी संत्र्याला भारतात सर्वत्र मागणी आहे. पोषक जमीन आणि पाणी हे मुख्य कारण आहे. राजस्थान आणि पंजाब येथील संत्र्यांची चव कडवट आहे. हा संत्रा दिल्ली भागात केवळ ज्यूससाठी वापरला जातो. याउलट नागपुरी संत्रा ‘टेबल फ्रूट’ मानले जाते. नागपुरातून भारतात सर्वत्र आणि काठमांडूपर्यंत संत्रा पाठविला जातो. आतापर्यंत पारंपरिक पद्धतीनेच संत्र्यांची विक्री करण्यात येत आहे. उत्पादन कमी वा जास्त झाले तरीही जास्त भाव मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी दरवर्षीच थोडाफार संत्रा रस्त्याच्या कडेला विक्री करीत असल्याचे चित्र आहे. विक्री व्यवस्थापनात बदल केल्यास संत्रा उत्पादकांना निश्चितच फायदा होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.पॅकिंग आणि प्रक्रिया कारखाने सुरू कराशासनाच्या कुचकामी धोरणामुळे नागपूर जिल्ह्यातील बंद असलेल्या प्रक्रिया आणि पॅकिंग कारखान्यांमुळे शेतकऱ्यांवर रस्त्यांवर संत्रे विकण्याची किंवा आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये आवक वाढल्याचे किंवा दिल्लीत थंडी वाढल्याचे कारण पुढे करून संत्र्याचे भाव जाणीवपूर्वक पाडले जातात. पूर्वी २५ ते ३० हजार रुपये टन असा भाव मिळालेल्या शेतकऱ्यांना जेव्हा १० हजार रुपये टन असा भाव मिळतो, तेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरतो. काटोल येथील १२ कोटींचा प्रक्रिया कारखाना ८ कोटींचा मोर्शी येथील आणि ८ कोटींचा कारंजा येथील पॅकिंग कारखाना धूळखात आहे. त्याकडे शासनाचे सपशेल दुर्लक्ष आहे. सध्या नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात १ लाख ३५ हजार हेक्टरवर ४ लाख संत्र्यांची झाडे आहेत. जास्त उत्पादन होणाऱ्या नागपुरी संत्र्याला सर्वाधिक मागणी आहे. पण स्थानिक भागात त्यावर प्रक्रिया करून अधिक रुपये मिळवून देणारे उद्योग प्रशासकीय यंत्रणेच्या तावडीत सापडल्याने संत्र्याचा कोळसा झाला आहे. हिवाळी अधिवेशनात पॅकेज द्यावे, अशी मागणी माजी आमदार सुनील शिंदे यांनी केली आहे.