शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

Nagar Panchayat Election Result: “शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी निकालात भाजपाच नंबर १”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 16:09 IST

भाजपाला २०१७ मध्ये ३४४ जागा मिळाल्या होत्या तर यंदाच्या निकालात ४१७ जागा पटकावल्या आहेत

मुंबई – राज्यातील नगर पंचायतीच्या निकालाचे चित्र आता बहुतांश स्पष्ट झाले आहे. राज्यात महाविकास आघाडीने भाजपाचा धुव्वा उडवला आहे. परंतु महाविकास आघाडी आणि भाजपा या चारही पक्षांची कामगिरी पाहिली तर राज्यात भाजपा नंबर एक पक्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. २०१७ च्या निवडणुकीपेक्षा २०२२ मध्ये भाजपाने जास्त जागा जिंकल्याची आकडेवारी समोर आली आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलंय की, २०१७ चा निवडणूक निकाल व आताचा निवडणूक निकाल पाहता राज्यात भाजपा क्रमांक १ चा पक्ष आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढले तरी महाराष्ट्रातील जनता भाजपासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उपाध्ये यांनी २०१७ आणि २०२२ च्या निवडणूक निकालाचे आकडे पोस्ट केले आहेत.

त्यात भाजपाला २०१७ मध्ये ३४४ जागा मिळाल्या होत्या तर यंदाच्या निकालात ४१७ जागा पटकावल्या आहेत. शिवसेनेने २०१७ मध्ये २०१ जागा जिंकल्या होत्या. त्यातही वाढ होऊन हा आकडा २९० इतका झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं २०१७ च्या निवडणुकीत ३३० जागा जिंकल्या होत्या त्यांना यंदाच्या निकालात ३६९ जागा मिळाल्या आहेत. यात मागील निवडणुकीच्या निकालाची तुलना केल्यास काँग्रेसला जबर फटका बसल्याचं दिसून येते. काँग्रेसला २०१७ च्या निकालात ४२६ जागा मिळाल्या होत्या तो आकडा २९९ पर्यंत खाली घसरला आहे.

राष्ट्रवादीचा देवेंद्र फडणवीसांना टोला

राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले असून हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे त्यामुळे हा पक्ष दोन-तीन जिल्ह्यापुरता मर्यादित आहे असं बोलणाऱ्यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी चपराक लगावली आहे अशा शब्दात NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(NCP Jayant Patil) यांनी देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) निशाणा साधला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा करुन तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रमे हाती घेतली होती. जनता दरबार उपक्रमातून जनतेची कामेही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला होता त्याचाही फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला आहे. या निकालांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलणाऱ्यांना चांगलीच चपराक लागली आहे असं त्यांनी म्हटलं.

 

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस