शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Nagar Panchayat Election Result: “शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी निकालात भाजपाच नंबर १”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 16:09 IST

भाजपाला २०१७ मध्ये ३४४ जागा मिळाल्या होत्या तर यंदाच्या निकालात ४१७ जागा पटकावल्या आहेत

मुंबई – राज्यातील नगर पंचायतीच्या निकालाचे चित्र आता बहुतांश स्पष्ट झाले आहे. राज्यात महाविकास आघाडीने भाजपाचा धुव्वा उडवला आहे. परंतु महाविकास आघाडी आणि भाजपा या चारही पक्षांची कामगिरी पाहिली तर राज्यात भाजपा नंबर एक पक्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. २०१७ च्या निवडणुकीपेक्षा २०२२ मध्ये भाजपाने जास्त जागा जिंकल्याची आकडेवारी समोर आली आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलंय की, २०१७ चा निवडणूक निकाल व आताचा निवडणूक निकाल पाहता राज्यात भाजपा क्रमांक १ चा पक्ष आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढले तरी महाराष्ट्रातील जनता भाजपासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उपाध्ये यांनी २०१७ आणि २०२२ च्या निवडणूक निकालाचे आकडे पोस्ट केले आहेत.

त्यात भाजपाला २०१७ मध्ये ३४४ जागा मिळाल्या होत्या तर यंदाच्या निकालात ४१७ जागा पटकावल्या आहेत. शिवसेनेने २०१७ मध्ये २०१ जागा जिंकल्या होत्या. त्यातही वाढ होऊन हा आकडा २९० इतका झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं २०१७ च्या निवडणुकीत ३३० जागा जिंकल्या होत्या त्यांना यंदाच्या निकालात ३६९ जागा मिळाल्या आहेत. यात मागील निवडणुकीच्या निकालाची तुलना केल्यास काँग्रेसला जबर फटका बसल्याचं दिसून येते. काँग्रेसला २०१७ च्या निकालात ४२६ जागा मिळाल्या होत्या तो आकडा २९९ पर्यंत खाली घसरला आहे.

राष्ट्रवादीचा देवेंद्र फडणवीसांना टोला

राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले असून हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे त्यामुळे हा पक्ष दोन-तीन जिल्ह्यापुरता मर्यादित आहे असं बोलणाऱ्यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी चपराक लगावली आहे अशा शब्दात NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(NCP Jayant Patil) यांनी देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) निशाणा साधला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा करुन तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रमे हाती घेतली होती. जनता दरबार उपक्रमातून जनतेची कामेही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला होता त्याचाही फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला आहे. या निकालांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलणाऱ्यांना चांगलीच चपराक लागली आहे असं त्यांनी म्हटलं.

 

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस