शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

उन्हाच्या झळांनी मुंबई तापली; कमाल तापमान ३७.८ अंश सेल्सिअस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 6:45 AM

राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानाचा आलेख चढाच असून, वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांच्या शरीराची काहिली होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सोमवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार भिराचे कमाल तापमान ४२ तर मुंबईचे कमाल तापमान ३७.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

मुंबई : राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानाचा आलेख चढाच असून, वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांच्या शरीराची काहिली होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सोमवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार भिराचे कमाल तापमान ४२ तर मुंबईचे कमाल तापमान ३७.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.उत्तरोत्तर कमाल तापमान स्थिर राहणार आहे. परिणामी, मुंबईकरांना बसणारे उन्हाचे चटके अधिकच वाढणार आहेत. कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच, दुसरीकडे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. किमान तापमानाचा विचार करता, विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.कोकण-गोवा व मराठवाड्याच्या काही भागांत, तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.मुंबईचा विचार करता, मागील तीनएक दिवसांपासून येथील कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे. ३० ते ३२ अंशावर असलेले कमाल तापमान, आता ३४, ३६ आणि ३७ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. तापदायक उन्हासह वाहते कोरडे आणि उष्ण वारे तापदायक वातावरणात आणखी भर घालत आहे. विशेषत: दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसत असून, रात्रीच्या उकाड्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.१३ ते १४ मार्च : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.१५ मार्च : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागांत हवामान कोरडे राहील.१६ मार्च : संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.१३ आणि १४ मार्च रोजी मुंबईचे कमाल, किमान तापमान अनुक्रमे ३८, २० अंशाच्या आसपास राहील. आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.