शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

Mumbai: राणीच्या बागेतील २५ प्राण्यांचा वर्षभरात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:00 IST

Mumbai: वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात वर्षभरात २५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात वर्षभरात २५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सहा प्राण्यांचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झाला आहे, तर अन्य प्राण्यांचा मृत्यू हा आजारपणामुळे झाला आहे. त्यामुळे प्राण्यांचे वाढते आजार हा चिंतेचा विषय बनला आहे. प्राणिसंग्रहालयात एका वर्षात २५ प्राण्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा प्राण्यांचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झाला आहे, तर सर्वाधिक म्हणजे १० पेक्षा जास्त प्राण्यांचा मृत्यू हृदयविकार व श्वसनासंबंधी आजारांमुळे झाल्याचे समोर आले आहे. या आकडेवारीनंतर प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. प्राण्यांमध्ये अशा प्रकारचे आजार का वाढत आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. 

वृद्धापकाळामुळे मृत प्राणी११ नोव्हेंबर २०२४ रोजी एका मादी हत्तीणीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे कारण वृद्धापकाळ व पोटातील गाठ, असे नमूद करण्यात आले. २ फेब्रुवारी २०२५ रोजी एका मगरीचा, याशिवाय दोन पोपट, एक पट्टेरी हायना आणि एक बगळा यांचाही वृद्धापकाळाने मृत्यू झाला.

वन्यजीवप्रेमींची चिंताप्राण्यांच्या या मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. वृद्धापकाळ आणि नैसर्गिक कारणांपलीकडे हृदयविकारासारख्या झटक्यांमुळे झालेले मृत्यू टाळण्यासाठी प्रशासनाने आरोग्य तपासण्या व वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

वन्यजीवप्रेमींची चिंताप्राण्यांच्या या मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. वृद्धापकाळ आणि नैसर्गिक कारणांपलीकडे हृदयविकारासारख्या झटक्यांमुळे झालेले मृत्यू टाळण्यासाठी प्रशासनाने आरोग्य तपासण्या व वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक मृत्यूस्पॉटेड डिअर, बार्किंग डिअर, सांबर, हरण, पेंटेड स्टॉर्क, बगळे व कासवे, अशा अनेक प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. या काळात एकट्या हरणांच्या प्रजातींमध्येच ११ मृत्यू झाले असून त्यातील बहुतेकांना कार्डिॲक शॉक किंवा श्वसन विकार कारणीभूत ठरले.

टॅग्स :rani bagichaराणी बगीचाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र