शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंचा गर्व देवानेच ठेचला; खा. नवनीत राणा यांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 13:09 IST

पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खासदार महिला, आमदाराला घरातून अटक केली. त्यांची चूक काय होती? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी विचारला.

अमरावती - उद्धव ठाकरे, तुमचा घमंड, गर्व देवानेच ठेचला. तुम किस खेत की मुली हो?..५६ वर्ष ज्या घराण्यात तुम्ही जन्माला आला ते घर टिकवू शकले नाही. विचारधारा टिकवू शकले नाहीत. आमदार सांभाळू शकले नाहीत. ज्या विचारधारेसाठी बाळासाहेबांनी जीवाचं रान केले. रक्ताचं पाणी केले, ते टिकवू शकले नाहीत. महाराष्ट्र काय बाळासाहेब ठाकरेंच्या डोळ्यातही अश्रू असतील. त्यांची विचारधारा बुडवण्याचं काम मुलानेच केले अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त राणा दाम्पत्यांकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. 

लॉकअपमध्ये कशी घालवली रात्र? स्टेजवर नवनीत राणांना अश्रू अनावर, काय घडलं?

खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, आज हनुमान चालीसा म्हटली म्हणून कुणी आपल्याला लॉकअपमध्ये टाकणार नाही. हनुमान चालीसा पठण केले म्हणून देशद्रोह खटला भरणार नाही. देशाच्या विरोधात काम करतोय असं कुणी म्हणणार नाही. ज्या भूमीत आपण सगळेच जन्मालो ती देवभूमी म्हणजे हिंदुस्तान, दगडातही देव शोधतो, आपली भक्ती-आस्था जोडली आहे. मातीच्या घरात राहत असो वा महलात राहत असला तरी देवाला मानतात. परंतु ज्या राज्याला संताची भूमी म्हणून ओळखले जाते याच महाराष्ट्रात ३३ महिन्याच्या सरकारने हनुमान चालीसा पठण केले म्हणून जेलमध्ये टाकले. आम्हाला हनुमान चालीसा म्हणण्याचा अधिकार नव्हता का? मुंबईत पाय ठेवला तर तुम्हाला गाडून टाकू अशी भाषा वापरली गेली तेव्हा महिला म्हणून मला काय वाटले असेल? असं त्यांनी सांगितले. 

तसेच अमरावतीने मला लढायला शिकवले, विदर्भाची सून म्हणून मी मुंबईत दाखल झाली. पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खासदार महिला, आमदाराला घरातून अटक केली. त्यांची चूक काय होती? हनुमान चालीसा पठण करा आम्ही धमकी नव्हती तर विनंती केली होती. २५-३० पोलीस घरात घुसले. आम्ही महाराष्ट्राला डाग लावून देणार नाही असं आम्ही सांगितले तरीही बळजबरीने आम्हाला वाहनात बसवून पोलीस स्टेशनला नेले तेव्हा काय वाटले असेल? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी केला. 

दरम्यान, पोलिसांना उद्धव ठाकरेंनी आदेश दिले. कोणत्या गुन्ह्याखाली आम्हाला अटक केली? हे आम्ही  विचारले. ते म्हणाले, मॅडम, मला काय विचारू नका, आम्हाला आदेश आहे. ज्या बाळासाहेबांनी रक्त आटवून राज्यातील प्रत्येक नागरिकांमध्ये हिंदू विचारधारा दिली. लढणे कशाला म्हणतात ते त्यांनी शिकवले. मात्र त्यांच्या सुपुत्राने ५६ वर्षाच्या मेहनतीला, विचारधारेची माती करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केले असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेHanuman Jayantiहनुमान जयंती