शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 20, 2015 15:40 IST

मंगोलियाला उदारतेने कर्ज देणा-या पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील शेतकरी व जैतापूर प्रकल्पात भरडल्या गेलेल्यांबाबतीत दाखवली तर बरं होईल, अशी टीका टोला उद्धव ठाकरेंनी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगोलियाला एक अब्ज डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा करून भारताच्या आर्थिक ताकदीची चुणूक दाखवली. मात्र हीच सढळता पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकरी व जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरडल्या जाणार्‍या कोकणी जनतेच्या बाबतीत दाखवली तर बरेच होईल असे सांगत शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान म्हणावी लागेल. अशी टीका त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच मंगोलियाला भेट दिली, त्यावेळी त्यांनी मंगोलियाला एक अब्ज डॉलरची मदत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या या निर्णयावरून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेच त्यांना लक्ष्य केले आहे. 
दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी पंतप्रधानांनी एक अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले. मंगोलियात पायाभूत सुविधांच्या विकासाची गरज आहे व ही जबाबदारी पंतप्रधानांनी कर्तव्य म्हणून स्वीकारली आहे. मात्र एक अब्ज डॉलर हा लहान आकडा नव्हे, त्याचे रुपयांत रुपांतर केल्यास  आकडा समोर येईल तो पाहून महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या हजारो शेतकर्‍यांचे आत्मे गोंधळून जातील, असे ठाकरेंनी अग्रलेखात म्हटले आहे.  सावकारी तसेच बँकांच्या कर्जविळख्याने महाराष्ट्रातील शेतकरी मेला आहे व मरतो आहे. गारपीटग्रस्त, अवकाळग्रस्त शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आजही आहे. महाराष्ट्रातून मदतीसाठी योग्य प्रस्ताव गेला नसल्याने शेतकरी मदतीविना तडफडतो आहे असे खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे खर्‍याचे खोटे व खोट्याचे खरे करण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही, पण महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान म्हणावी लागेल. यापूर्वी भूतान वगैरे राष्ट्रांनाही आमच्या पंतप्रधानांनी भरघोस आर्थिक मदत केली आहे. शेजारच्या लहान व गरीब राष्ट्रांना मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे व ती एक विदेश नीतीसुद्धा आहे. लहान व विकसनशील राष्ट्रांना हिंदुस्थानसारख्या मोठ्या राष्ट्रांकडून ही अपेक्षा असते व आमचे पंतप्रधान बाहेर जातात तेव्हा अशा राष्ट्रांना सढळहस्ते मदत करीत असतात. मात्र हीच सढळता व सहृदयता आमच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या बाबतीत दाखवली व जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरडल्या जाणार्‍या कोकणी जनतेच्या बाबतीत दाखवली तर बरे होईल, असा टोला त्यांनी लेखात हाणला आहे. केंद्राच्या व महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी मिळून शेतकर्‍यांच्या आत्महत्या व रखडलेल्या मदतीचा प्रश्‍न तेवढा निकाली लावावा हीच प्रार्थना, असेही त्यांनी लेखात नमूद केले आहे.