शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

पंतप्रधानांच्या आयुष्यमान योजनेत गोंधळ; मोबाईल नंबर एकाचा, कुटुंब भलतेच

By हेमंत बावकर | Published: September 19, 2018 11:48 AM

 पंतप्रधान जन आरोग्य योजनेद्वारे 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे आरोग्य कवच मिळणार आहे. ही योजना झारखंडमधून सुरु करण्यात येणार आहे.  या योजनेचा लाभ सामाजिक-आर्थिक जनगणनेवर मिळणार आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या महत्वाकांक्षी पंतप्रधान जन आरोग्य योजनेची सुरुवात येत्या 23 सप्टेंबरपासून करणार आहेत. मात्र, या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ दिसून येत आहे. मोबाईल नंबर एकाचा आणि नावे दुसऱ्यांचीच असे प्रकार झाल्याने दोन्ही कुटुंबे 5 लाखांच्या विमा संरक्षणापासून मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  पंतप्रधान जन आरोग्य योजनेद्वारे 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे आरोग्य कवच मिळणार आहे. ही योजना झारखंडमधून सुरु करण्यात येणार आहे.  या योजनेचा लाभ सामाजिक-आर्थिक जनगणनेवर मिळणार आहे. यासाठी 30 एप्रिलपासून एक मोहीम चालविण्यात आली होती. याद्वारे या योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांची माहिती, मोबाईल नंबर आणि रेशन कार्डचा नंबर गोळा करण्यात आले. 

या योजनोसाठी पात्र असल्याची माहिती mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर तपासली असता धक्कादायक वास्तव समोर आले. सिंधुदुर्गच्या एका कुटुंबप्रमुखाचा मोबाईल नंबर टाकून त्याची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला असता हिंगोलीच्या गिरगावातील एका कुटुंबाचे नाव आले. या कुटुंबामध्ये सात जण आहेत. या गोंधळामुळे सिंधुदुर्गमधल्या कुटुंबासह हिंगोलीतील कुटुंबही या योजनेच्या लाभापासून मुकण्याची शक्यता आहे. 

विशेष म्हणजे हा मोबाईल नंबर 2010 पासून सिंधुदुर्गमध्ये वापरात आहे. परंतू जनगणना 2011 मध्ये झालेली होती. तसेच 30 एप्रिल 2018 पासून एसईसीसीने मोहीम राबविली होती. यामध्ये ग्रामसभांमधून पात्र कुटुंबांचे मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड घेण्यात आले होते. असे असूनही गेल्या 9 वर्षांपासून मोबाईल नंबर सिंधुदुर्गमध्ये वापराला जात आहे. तसेच हिंगोली सिंधुदुर्गपासून सुमारे 600 किमी दूर आहे. 

आयुष्यमान योजनेत तुमचे नाव आहे का? असे तपासा...

पंतप्रधान जन आरोग्य योजनेतून केवळ 10 कोटी कुटुंबांनाच विमा संरक्षण मिळणार आहे. यामध्ये शहरी भागातील कुटुंबांचाही समावेश आहे. यामुळे आधीच बरीच गरजू कुटुंबे या योजनेपासून वंचित राहणार असताना ज्या कुटुंबांना योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे त्यांनाही अशा प्रकारच्या गोंधळामुळे मुकावे लागणार आहे.  

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतsindhudurgसिंधुदुर्गNandedनांदेडNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारMobileमोबाइल