शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

मोदीसाहेब, तुमच्या नेत्यांनी केलेल्या ‘वादग्रस्त ’ वक्तव्यांची लाज वाटत नाही कां.. ? अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 1:30 PM

भाजपवाले मोदींना विष्णूचा ११ वा अवतार सांगतात, हनुमानाची जात काढतात...

ठळक मुद्देकाँग्रेसचे मोहन जोशी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सभा

पुणे : सहा वर्षांपूर्वी मी जे बोलायला नको होतं ते अनावधानाने बोलून गेलो.. त्याची माफी मागितली, प्रायश्चित्त घेतलं, आत्मक्लेश सुध्दा करुन घेतला..  पुन्हा कुठं चुकलो का .. ? इतिहासातून शिकलो ना..पण ते वाक्याचा अजूनही संदर्भ दिला जातो.. पण  तुमचे नेते शेतकऱ्यांच्या मुलांना लावरिस, साले म्हणतात , तसेच मुली पळविण्याचा सल्ला देतात , हुनमानाची जात देखील काढतात... त्याची लाज वाटत नाही का..? त्याचं काय,  त्यांना तसे बोलण्याचा अधिकार कुणी दिला असा संतप्त सवाल अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींना केला.. पुण्यात काँग्रेसचे मोहन जोशी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते. यावेळी या वेळी, काँग्रेसचे उल्हास पवार, हर्षवर्धन पाटील, इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे, अंकुश काकडे, सुप्रिया सुळे , कुमार सप्तर्षी यांच्यासह राष्ट्रवादी , काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. पवार म्हणाले, भौजपाला त्यांनी पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. या सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला असून असे वक्तव्य करुन ते जनतेची दिशाभूल करत आहे. मोदी देशाच्या कुटुंबाबद्द्ल बोलण्याएैवजी पवार कुटुंबियांबद्दल बोलत आहे. ते मी , माझी बहीण पाहून घेऊ असेही त्यांनी सांगत मोदींना लक्ष केले . तसेच २५ वर्ष शिवसेना सडली होती पण आता त्यांची सटकली आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात केली.आघाडीचे पुण्यातील उमेदवार मोहन जोशी आणि बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच्या सभेत ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की, शिवसेना 25 वर्ष सडली होती. भाजपला नालायक सरकार, अफजलखान म्हणणारे आता कुठे गेले.त्यांना काहीही व्हिजन नाही, विकास नाही. यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:पुण्याच्या पाणी प्रश्नाकडे कुणाचं लक्ष नाही. मतं मागायला जातात. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे.पण तुम्हाला फक्त निवडणुका दिसतात का? मतं मागण्याआधी आम्ही दुष्काळ प्रश्नाला अग्रक्रम दिला. 45 वर्षात एवढी बेरोजगारी वाढली नव्हती.सरकारला बेरोजगारी , शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता आले नाही .वर्ध्याच्या सभेत आल्यावर आम्हाला अपेक्षा होती की मोदी, 5 वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनावर बोलतील. देशाच्या कुटुंबियांबाबत  बोलण्याची गरज असताना पंतप्रधानांना पवार कुटुंबियांवर बोलण्याचे कारण काय होते?आश्वासनांचे हातभार गाजर काढलंय. आता गाजर पण लाजायला लागले.  तसेच भाजपमधील अडवाणी , मुरली मनोहर जोशी यांचीपरिस्थिती काय झाली हे सर्वजण पाहतच आहोत..  

टॅग्स :Puneपुणेpune-pcपुणेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAjit Pawarअजित पवार