शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मोदीसाहेब, तुमच्या नेत्यांनी केलेल्या ‘वादग्रस्त ’ वक्तव्यांची लाज वाटत नाही कां.. ? अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 13:45 IST

भाजपवाले मोदींना विष्णूचा ११ वा अवतार सांगतात, हनुमानाची जात काढतात...

ठळक मुद्देकाँग्रेसचे मोहन जोशी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सभा

पुणे : सहा वर्षांपूर्वी मी जे बोलायला नको होतं ते अनावधानाने बोलून गेलो.. त्याची माफी मागितली, प्रायश्चित्त घेतलं, आत्मक्लेश सुध्दा करुन घेतला..  पुन्हा कुठं चुकलो का .. ? इतिहासातून शिकलो ना..पण ते वाक्याचा अजूनही संदर्भ दिला जातो.. पण  तुमचे नेते शेतकऱ्यांच्या मुलांना लावरिस, साले म्हणतात , तसेच मुली पळविण्याचा सल्ला देतात , हुनमानाची जात देखील काढतात... त्याची लाज वाटत नाही का..? त्याचं काय,  त्यांना तसे बोलण्याचा अधिकार कुणी दिला असा संतप्त सवाल अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींना केला.. पुण्यात काँग्रेसचे मोहन जोशी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते. यावेळी या वेळी, काँग्रेसचे उल्हास पवार, हर्षवर्धन पाटील, इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे, अंकुश काकडे, सुप्रिया सुळे , कुमार सप्तर्षी यांच्यासह राष्ट्रवादी , काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. पवार म्हणाले, भौजपाला त्यांनी पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. या सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला असून असे वक्तव्य करुन ते जनतेची दिशाभूल करत आहे. मोदी देशाच्या कुटुंबाबद्द्ल बोलण्याएैवजी पवार कुटुंबियांबद्दल बोलत आहे. ते मी , माझी बहीण पाहून घेऊ असेही त्यांनी सांगत मोदींना लक्ष केले . तसेच २५ वर्ष शिवसेना सडली होती पण आता त्यांची सटकली आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात केली.आघाडीचे पुण्यातील उमेदवार मोहन जोशी आणि बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच्या सभेत ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की, शिवसेना 25 वर्ष सडली होती. भाजपला नालायक सरकार, अफजलखान म्हणणारे आता कुठे गेले.त्यांना काहीही व्हिजन नाही, विकास नाही. यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:पुण्याच्या पाणी प्रश्नाकडे कुणाचं लक्ष नाही. मतं मागायला जातात. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे.पण तुम्हाला फक्त निवडणुका दिसतात का? मतं मागण्याआधी आम्ही दुष्काळ प्रश्नाला अग्रक्रम दिला. 45 वर्षात एवढी बेरोजगारी वाढली नव्हती.सरकारला बेरोजगारी , शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता आले नाही .वर्ध्याच्या सभेत आल्यावर आम्हाला अपेक्षा होती की मोदी, 5 वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनावर बोलतील. देशाच्या कुटुंबियांबाबत  बोलण्याची गरज असताना पंतप्रधानांना पवार कुटुंबियांवर बोलण्याचे कारण काय होते?आश्वासनांचे हातभार गाजर काढलंय. आता गाजर पण लाजायला लागले.  तसेच भाजपमधील अडवाणी , मुरली मनोहर जोशी यांचीपरिस्थिती काय झाली हे सर्वजण पाहतच आहोत..  

टॅग्स :Puneपुणेpune-pcपुणेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAjit Pawarअजित पवार